HW News Marathi
मुंबई

येत्या ४८ तासात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

मुंबई | येत्या ४८ तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हवामान खात्याने दोन दिवस रेड अलर्ट जारी केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १४ व १५ जुलैला मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या शनिवारपासून ते मंगळवारपर्यंत पावसाने मुंबईसह उपनगराला चांगलेच झोडपून काढले होते. त्यानंतर पावसाने बुधवारपासून विश्रांती घेतली आहे. परंतु पुन्हा वरुण राजाचे आगमन होणार आहे. १४ आणि १५ जुलैला मुसळधार पाऊस त्यांची पूर्वतयारी मुंबई महापालिकेने करणे गरजेचे आहे.

येत्या ४८ तासात मुंबई शहरात, उपनगरात, ठाणे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदर्ग या सर्व भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईवर ‘अस्मानी’ संकट,खासगी आणि सरकारी कार्यालयांना आज सुट्टी जाहीर

News Desk

पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय

News Desk

गुढीपाडव्याच्या आधी राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला राजकीय वर्तुळात खळबळ

News Desk