HW News Marathi
मुंबई

कॉंग्रेसने उंदीर सोडले की काय | रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या उंदीर घोटाळ्यावरील आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की मंत्रालयात एवढे उंदीर कोठून आले, आमचे सरकार आल्याने काँग्रेसच्या लोकांनी उंदीर आणून सोडले की काय, चांगल्या उंदरांना त्रास देऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

मंत्रालयात उंदीर किती मारले व त्यासाठी किती निधी खर्च झाला, यावरून सध्या वादंग सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले, की मी राज्यात मंत्री असताना त्याकाळात मंत्रालयात एकही उंदीर नव्हता. उंदीर जास्त वळवळ करतात. ते आगाऊपणा करत चुकीचे काम करतात, असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली.

येत्या २६ मार्च रोजी भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाचे आपल्याला निमंत्रण मिळाले नाही. त्यामुळे आमचा पक्ष मोर्चात सामील होणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईजवळ जहाजावरील तीन खलाशांचा मृत्यू

News Desk

वाघ चिन्ह असणा-याकडेही लक्ष द्या | धनंजय मुंडे यांचा मिश्किल सवाल

News Desk

चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीला अटक

News Desk
देश / विदेश

राज्यसभेवर भाजपचे पहिल्यांदा ६९ खासदार तर बहुमतासाठी १२६

News Desk

नवी दिल्ली | राज्यसभेत भाजपचे ३८ वर्षात पहिल्यांदाच ६९ खासदार निवडून आले आहेत. काँग्रेसचे ५० सदस्य असे संख्या बळ आहे. राज्यासभेत २४५ एकूण सदस्यांची संख्या आहे. राज्यसभेत बहुमतासाठी १२६चा सदस्यांचे संख्याबळ असणे गरजेचे आहे. राज्यसभेत शुक्रवारी सात राज्यांतील २६ जागांवर निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपला १० जागापैकी ९ जागावर भाजप विजय मिळाला आहे.

भाजपला १२६चा आकडा गाठण्यासाठी मित्रपक्षांची गरज आहे. पण, सध्या भाजपचे मित्रपक्ष त्यांच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळे भाजपला बहुमत मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नुकतेच भाजपचा मित्रपक्ष तेलगू देसम पार्टी यांनी आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे एनडीएतून बाहेर पडले आहेत.

राज्यसभेतील १७ राज्यातील ५८ जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी ३३ जागावर बिनविरोधी निवड झाली होती. फक्त २६ जागासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील १० जागैपकी ९ जागांवर भाजप निवडून आली. उत्तर प्रदेशात पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर राज्यसभेच्या १० जागांवर सर्वांचे लक्ष लागले होते.

Related posts

102 व्या घटनादुरुस्तीत बदल करणारे विधेयक आज लोकसभेत मांडलं!

News Desk

“आजच्या अर्थसंकल्पात आत्मनिर्भरतेचे दर्शन”, बजेटनंतर पंतप्रधानांनी दिली प्रतिक्रिया

News Desk

बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर, ट्रम्प यांचा ‘तो’ निर्णय बायडेन मागे घेण्याची शक्यता

News Desk