HW News Marathi
मुंबई

कॉंग्रेसने उंदीर सोडले की काय | रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या उंदीर घोटाळ्यावरील आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की मंत्रालयात एवढे उंदीर कोठून आले, आमचे सरकार आल्याने काँग्रेसच्या लोकांनी उंदीर आणून सोडले की काय, चांगल्या उंदरांना त्रास देऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

मंत्रालयात उंदीर किती मारले व त्यासाठी किती निधी खर्च झाला, यावरून सध्या वादंग सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले, की मी राज्यात मंत्री असताना त्याकाळात मंत्रालयात एकही उंदीर नव्हता. उंदीर जास्त वळवळ करतात. ते आगाऊपणा करत चुकीचे काम करतात, असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली.

येत्या २६ मार्च रोजी भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाचे आपल्याला निमंत्रण मिळाले नाही. त्यामुळे आमचा पक्ष मोर्चात सामील होणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकल घसरली; ३ जखमी

News Desk

शेतकऱ्यांचा लाल सागर मुंबईत धडकला, सरकारची धावपळ सुरू

News Desk

मराठा पक्ष स्थापनेचा घोषणा?

News Desk