HW News Marathi
मुंबई

नीट परीक्षेसाठी लढा देणाऱ्या तरूणची आत्महत्या

चेन्नई- बारावीनंतर मेडिकल कॉलेजमध्ये प्रेवश घेण्यासाठी प्रत्येक राज्याची सीईटी होते. परंतु केंद्र सरकारने आता सर्वांसाठी नीट परीक्षा सक्तीची केली आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणाऱ्या तामीळनाडूमधी दलित तरुणीने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकारमुळे तामीळनाडू पेटले असून ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाले आहेत. अतिशय हालाखीची परिस्थिती असताना या मुलीने बारावी परीक्षेत बाराशेपैकी 1127 मार्क मिळवले होते. परंतु नीट परीक्षेत तिला कमी मार्क मिळाले, त्यामुळे तिला मेडीकलमध्ये प्रेवश मिळू शकला नाही. ज्या कारणासाठी ती सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागत होती, तेच कारण निरर्थक ठरल्याने नैराश्य येऊन तरुणीने आत्महत्या केला. दरम्यान, गरीबी परिस्थितीत शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अशा मुलींना नीटसाठी खासगी शिकवणी लावणे शक्य होत नाही. केंद्र व राज्य सरकार नवनवे नियम आणून गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे, यातून आत्महत्याचा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर तरी सरकारला शहाणपण येईल आणि गरजु, गरीब विद्यार्थ्यांसाठी वेगळा पर्याय निवडेल का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जेव्हीएलआरला ‘संत शिरोमणी श्री गाडगे महाराज मार्ग’ नाव देण्याचा प्रस्ताव मंजुर

Gauri Tilekar

पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी स्वस्त होणार

News Desk

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटरनंतर सहाय्यक अभियंत्याला अटक

News Desk
व्हिडीओ

६८ वर्षीय वृद्धाची बाबासाहेबांना अनोखी श्रद्धांजली

News Desk

घायाळ पाखरांना पंख दिले तू, मुक्या वेदनांना शब्द दिले तू असे महामानवाला वंदन करत आपल्या कलेच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्याची अनोखी प्रथा गुरुवारीही धम्मभक्तांना पाहायला मिळाली. बाबासाहेबांच्या प्रतिमेची सुंदर रांगोळी नाशिक येथील ज्येष्ठ रांगोळीकार नारायण चुंबळ यांनी रेखाटली होती.

गुरुवारी 6 डिसेंबरला दादर येथील चैत्यभूमीवर लाखो बुद्ध अनुयायांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.या प्रचंड जनसमुदायात लहान थोरांपासून सर्वच अनुयायांचा समावेश होता. परंतु गेल्या 10 वर्षांपासून आपल्या कलेमार्फत रांगोळी साकारत अनोखा आदर्श , प्रेरणा अनुयायांपुढे ठेवली आहे. ही रांगोळी बाबासाहेबांची फक्त प्रतिमा नसून आमची प्रेरणा आहे. त्यांनी संविधानातून दिलेला समतेचा संदेश आज मी माझ्या कलेतून पुढे लोकांपर्यंत नेत आहे, असे ६८ वर्षीय नारायण चुंबळ यांनी सांगितले.

या रांगोळीसाठी त्यांनी सकाळी 6 वाजता सुरुवात केली. ३ तासांचा कालावधी या रांगोळीसाठी त्यांना लागला यामध्ये एकूण 15 किलो रांगोळी आणि आदी साहित्याचा वापर करण्यात आला आहे.

Related posts

Aaditya Thackeray Shivsena | शिवसेनेसाठी जन आशीर्वाद यात्रा नव्हे…पूरग्रस्त महत्त्वाचे !

Gauri Tilekar

“तुमच्या चॅलेंजला भिकेची टोपली घालतो…’; आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजला संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर

News Desk

निती आयोगाने राज्याला Corona Third wave चा कोणताही ईशारा दिलेला नाही

News Desk