HW News Marathi
मुंबई

गोड्या पाण्यातील मच्छिमारांचे धरणे आंदोलन

मुंबई – राज्यात परंपरागत गोड्या पाण्यात मासेमारी करणारे मच्छिमार विविध मागण्यांसाठी 2 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आझाद मैदान येथे करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांचे कर्ज माफ करण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी. मत्स्यव्यवसायाची इत्यंभूत माहिती असणाऱ्या व्यक्तीला मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून नेमावे आणि महादेव जानकर यांच्याकडून हे पद काढून घ्यावे अशी मागणी यावेळी महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीच्यावतीने करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Mumbai Dongri Building Collapsed : बचावकार्य युध्दपातळीवर सुरू | मुख्यमंत्री

News Desk

शिवसेनेनं सरकारमधून बाहेर पडून शिवसंपर्क मोहीम राबवावी – अशोक चव्हाण

News Desk

अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान कल चाचणीस प्रतिबंध

Aprna
महाराष्ट्र

पांडुरंग फुंडकर दांडी मारण्यात अव्वल

News Desk

मुंबई: राज्य मंत्रीमंडळ बैठकीत सतत दांड्या मारण्यात कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर अव्वल ठरले आहेत. त्यांच्यापोठपाठ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, संभाजी निलंगेकर-पाटील, राजकुमार बडोले यांचा क्रमांक लागतो. माहिती अधिकारांतर्गत सचिवालयाने ही माहिती जारी केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडे मंत्रिमंडळाच्या बैठकी आणि मंत्र्याची उपस्थितीची माहिती मागितली होती. मुख्य सचिव कार्यालयाचे अवर सचिव आणि जन माहिती अधिकारी केळकर यांनी ही माहिती दिली आहे. 17 जुलै 2016 पासून 22 मे 2017 या कालावधीत एकूण 35 मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता 22 च्या 22 मंत्र्यानी दांडी मारली. या दांडी बहादुरीत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अव्वल क्रमांक पटवित 35 पैकी 11 वेळा अनुपस्थित होते. त्यानंतर वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही 9 वेळा अनुपस्थित राहत दुसरा क्रमांक पटकविला. यानंतर ग्रामीण आणि महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा क्रमांक लागतो.

Related posts

स्वबळावर निवडणुका लढवण्याची आमची भूमिका योग्यच! काँग्रेसचा पुनरुच्चार

News Desk

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा! – अब्दुल सत्तार

Aprna

आजपासून १२ वीचे ऑनलाईन फॉर्म

News Desk