HW News Marathi
देश / विदेश

एटीएममधून १०० ऐवजी पाचशेच्या नोटा

भरतपूर बँकेच्या एटीएममधून शंभर ऐवजी ५०० रुपयांच्या नोटा निघाल्याचा प्रकार भरतपूर येथे उघडकीस आला. ही बातमी कळताच अवघ्या काही मिनिटांत एटीएममधून लोकांना लाखो रुपये काढून पोबारा केला.

भरतपूरमधील डीग गावातील ही घटन असून २४ जुलै रोजी अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून शंभर ऐवजी पाचशेच्या नोटा बाहेर येत असल्याचे समजताच लोकांची पैसे काढण्यासाठी झुंबड उडाली. पाचपट जास्त रक्कम मिळत असल्याने अनेकांनी यात हात धुवून घेतले. बँक कर्मचाऱ्यांना हा प्रकार समजल्यानंतर पैसे काढण्याऱ्यांचा शोध घेतला जात आहे. परंतु अनेकांनी पैसे परत करण्यास नकार दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानीच अव्वल

Gauri Tilekar

‘विरोधी पक्ष नेते दिल्लीत जो काही बॉम्ब घेऊन आले होते तो भिजलेला लवंगी फटाका’, राऊतांचा फडणवीसांना टोला  

News Desk

उर्जित पटेल यांच्याबाबत तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का ?

News Desk
देश / विदेश

बिहारमध्ये राजकीय भूकंप

News Desk

नवी दिल्ली: बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. जेडीयूच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपाल के. एन. त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. इतकेच नाही तर मोदींनी त्यांना भाजपमध्ये येण्याची आॅफरही दिली आहे. भ्रष्टाचाराशी आपण एकत्र लढू असेही मोदींनी म्हटले आहे.

तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपद न सोडण्यावर ठाम आहेत. आरोप असलेल्या मंत्र्यांसोबत काम करणे अशक्य असल्याचे नितिशकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले आहे. बिहारच्या हितासाठी आपण काहीही करायला तयार आहे.

बिहारमधील जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महायुती अवघ्या २० महिन्यांत तुटली आहे. लालू प्रसाद यादव यांनी ही चर्चा वायफळ असल्याचे म्हटले होते. महाआघाडी तुटण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले होते.

‘नितीशकुमारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितलेला नाही. या प्रकरणात मीडियालाच अधिक स्वारस्य आहे. नितीशकुमार आमचे नेते आहेत. ‘महाआघाडीत फूट’ या मीडियातून पसरवल्या जाणाºया अफवा आहेत.’, असे लालूंनी काही वेळेपूर्वी म्हटले होते.

राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर लालू यादव म्हणाले, ‘बिहार सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. महाआघाडीत काहीही चलबिचल नाही. सगळ्या मीडियाच्या अफवा आहेत. नितीशकुमारांनी तेजस्वींचा राजीनामा मागितलेला नाही.’ तेजस्वी यादवही म्हणाले की मला कधीही राजीनामा मागितला गेला नाही. नितीशकुमारांनीही आज आमदारांची बैठक बोलावली आहे. लालू यादव व त्यांच्या कुटुंबावर रेल्वे निविदा घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तेजस्वी यादवांच्या राजीनाम्याची भाजपने मागणी केली होती. जेडीयूचे म्हणणे होते की तेजस्वी यांनी जनतेसमोर स्पष्टीकरण द्यावे.

Related posts

#PulwamaAttack | मातृभूमीसाठी जम्मूतील डॉक्टरांनी घेतली ‘ही’ प्रतिज्ञा

News Desk

…अशीच मदत किंगफिशर एअरलाईन्सला का केली नाही ?

News Desk

HW न्यूज नेटवर्कच्या दोन्ही महिला पत्रकारांना जामीन मंजूर

News Desk