HW News Marathi
देश / विदेश

कथा एका सौंदर्यवान किन्नराची!

नवी दिल्ली – एका मणिपुरी तृतीय पंथीयाचा फोटो सध्या सोशल मिडियावर गाजतोय. त्याचं कारणही तसंच आहे. कारण फोटो पाहिल्यावर हा किन्नर नसून कुणीतरी सौंदर्यवती मॉडेल आहे, असा भास होतो. या तृतीय पंथीच्या सौंदर्याला भलेभले भुलत आहेत.

मणिपूरचा रहिवासी बिशेष हुईरम हा 27 वर्षांचा किन्नर आहे. कोणत्याही मॉडेलपेक्षाही आखीव-रेखीव सौंदर्य असल्याने तो विशेष चर्चेत आला आहे. बिशेषने थायलंडमध्ये झालेल्या मिस इंटरनॅशनल क्विन ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला होता. तसेच अनेक मणिपूरी चित्रपटांमध्येही बिशेषने काम केले आहे. त्याचबरोबर बिशेष हुईरमने बंगळुरू विद्यापीठातून फॅशन आणि ड्रेस डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला आहे.

बिशेषच्या आई-वडिलांना आपला मुलगा किन्नर असल्याचे कळले, तेव्हा त्यांनी त्याला हाडतूड न करता साथ दिली. त्याचे वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आहेत. बिशेषची आई कोमदोन्बी यांनी सांगितले की, लहानपणापासून त्याला मुलींचे कपडे घालण्याची हौस होती. त्यांच्यासारखाच मेकअप करायला त्याला आवडायचे. हे पाहून त्याचे वडील आणि मी खूप नाराज व्हायचे. मात्र हळुहळु सत्य आमच्या लक्षात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोरोनाच्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी केंद्राची ४ डिसेंबरला बैठक होणार

News Desk

चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

News Desk

‘उत्तर प्रदेशात शीर कापून आणणाऱ्याला १ कोटींचे बक्षीस’

Gauri Tilekar
महाराष्ट्र

फळभाज्यांचे भाव गगनाला

News Desk

नाशिक : काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आवक घटली आहे. त्याच वेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून गुजरातमध्ये मोठया प्रमाणात फळभाज्यांची निर्यात होत असल्याने बाजारभाव तेजीत आहेत. परिणामत; किरकोळ बाजारात फळभाज्यांचे दर गगनाला भिडले असून सर्वसामान्य ग्राहक चिंतेत आहे.

नाशिक बाजारसमितीतून गुजरात राज्यात शेतमालाला मागणी वाढलेली असल्याने बाजारभावात तेजी निर्माण झालेली आहे. ढोबळी मिरची ३० रूपये प्रति किलो, लामडी वांगी ५० रूपये, दोडका ४० रूपये, भोपळा ३० रूपये नग, हिरवे वांगी ३५ रूपये, लाल वांगी ४० रूपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत असल्याचे भाजीपाला व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले.

पावसाने सध्या उघडीप दिलेली असली, तरी नवीन फळभाज्या दाखल झाल्या नसल्याने बाजारभाव तेजीत आहे. मात्र आगामी काही दिवसात सर्वच फळभाज्या मोठया प्रमाणात दाखल होण्याची शक्यता असल्याने बाजारभाव घसरण्याची शक्यता असल्याचे बाजारसमिती सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत किमान ४० रुपये प्रतिकिलो बाजारभाव असलेल्या फळभाज्या किरकोळ बाजारात व हातगाडीवर ग्राहकांना ७० ते ८०रुपये प्रतिकिलो दराने खरेदी कराव्या लागत आहेत

Related posts

“बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखे….,” चंद्रकांत पाटलांची खंत

News Desk

नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने मदत द्या, काँग्रेस शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

News Desk

पेन ड्राईव्ह केस सीबीआयकडे न दिल्याने भाजपचा सभात्याग

Aprna