HW News Marathi
देश / विदेश

तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर- जम्मू-काश्मीरमधील बडगम जिल्ह्यात भारतीय लष्करांनी दहशतवाद्यांविरोधात केलेल्या धडक कारवाईत तीन दहशतवादी ठरा झाले झाले. मंगळवारी जवानांनी सायंकाळपासून व्यापक मोहीम हाती घेतली होती. दरम्यान आज पाहटे दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला प्रत्यूत्तर देताना तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय त्यांच्याकडून मोठे शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आले. या कारवाईमुळे दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यात आला. रेडवोरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या पार्श्वभूमिवरून जवानांनी शोध सुरू केला होता. अमरनाथ भाविकांच्या बसवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमिवरून देशभरात कडक सुरक्षा करण्यात येत आहे. शिवाय,महत्त्वांच्या शहरांना अलर्ट देण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

1 एप्रिल म्हणजे मोदींचा वाढदिवस; राष्ट्रवादीकडून अनोखा वाढदिवस साजरा!

News Desk

विजय माल्याला अटक

News Desk

छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान होऊनही भाजपचे तोंड बंद !

News Desk
मुंबई

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला देण्यास विरोध

News Desk

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्कजवळचा महापौर बंगला देण्यास विरोध होत आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी शंभर कोटींचा निधी मंजूर करण्यासही जनहित मंच या संघटनेने विरोध केला आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी प्राथमिक सुनावणी झाली. पुढील आठवड्यात सविस्तर सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट करत सुनावणी तहकूब करण्यात आली.

जनहित मंचाच्या वतीने भगवानदास रयानी यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार सरकारी बंगला स्मारकासाठी देणे सर्वोच्च न्यायालयाच्या 2013 मधील आदेशानुसार केंद्र सरकारने 2014 मध्ये काढलेल्या अधिसूचनेचा भंग आहे. राजकीय नेत्याच्या स्मारकासाठी अशा पद्धतीने बंगला देता येत नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. सरकारी निवासस्थान असलेल्या बंगल्यात स्मारक करता येत नाही, असा दावा करत याबाबत मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनाही कळवण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे.

Related posts

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशीही ऐतिहासिक वाढ

News Desk

‘आर्थिक निकषावर आरक्षणाचा डावा उधळून लावू’ | रामदास आठवले

News Desk

#PulwamaAttack : नालासोपारामध्ये पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ रेल रोको आंदोलन

News Desk