HW News Marathi
देश / विदेश

नागरिकतेवर प्रश्न उपस्थित करणे यासारखे दुर्दैव नाही – हमीद अन्सारी

नवी दिल्ली – जमावांकडून एखाद्या निष्पाप व्यक्तीची निर्घृणपणे करण्यात येणारी हत्या, ‘घरवापसी’, यांसारख्या घटना घडत असतील, तर ही भारतीय मूल्य कमकुवत होत असल्याची लक्षणे आहेत. तुमच्या भारतीय नागरिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे, यासारखी दुसरी दुर्दैवी घटना नाही, अशा शब्दांत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

सलग दुसऱ्यांदा उपराष्ट्रपतिपद भूषवलेल्या अन्सारी यांचा कार्यकाळ आज गुरुवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा टीव्हीने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.

‘देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना आहे. मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहिले जाते. देशातील वेगवेगळ्या भागात मी गेलो, त्यावेळी मला असेच संशयाचे बोल ऐकायला मिळाले. बेंगळुरूला गेलो तेव्हाही मी हेच ऐकले आणि उत्तर भारतातून तर मोठ्या प्रमाणात असेचऐकायला मिळते,’ असेही अन्सारी म्हणाले. देशभर सुरू असलेल्या तीन तलाकवर बोलताना अन्सारी म्हणाले की, तीन तलाकच्या अनुचित प्रथेबद्दल दुमत होऊ शकत नाही. मात्र न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, कारण कोणताही बदल समाजामधूनच होत असतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ऐकावे ते नवलच ‘आदर्श सून’ होण्याचा कोर्स

News Desk

मातृभाषेच्या रक्षणाची मोहीम, लोकचळवळ झाली पाहिजे – उपराष्ट्रपती

News Desk

#Article370Abolished : काश्मीरच्या निर्णयावर फारुख अब्दुल्लांची सरकारवर जहरी टीका

News Desk