HW News Marathi
देश / विदेश

मोदींच्या मते SCAM म्हणजे सपा, काँग्रेस, अखिलेश व मायावती  

मेरठ – उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक ही भाजपसाठी ‘स्कॅम’विरोधातील लढाई आहे. आणि हे ‘स्कॅम’ म्हणजे – ‘सपा, काँग्रेस, अखिलेश आणि मायावती ‘ आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका केली.

‘काँग्रेसवाले उत्तर प्रदेश सरकारला बदनाम करत होते, त्यांच्या कारभारावर टीका करत होते. मग, रातोरात असे काय घडले, की हे दोन्ही पक्ष गळ्यात गळे घालून अचानक एकत्र आले’ असा सवाल मोदींनी उपस्थित केला. ‘ जे पक्ष गेली काही दशके, रात्रंदिवस एकमेकांवर सतत टीका करून दुस-याला संपवण्याता प्रयत्न करत होते. ते आता अचानक एकत्र येऊन, गळ्यात गळे घालून वाचवा, वाचवा असे ओरडत आहेत. जे स्वत:चा बचाव करू शकत नाहीत, ते उत्तर प्रदेशला काय वाचवणार?’ असा सवाल मोदींनी विचारला.

‘ मी दिल्लीवरून उत्तर प्रदेशला मदत करण्याचा प्रयत्न केला, तरी राज्य सरकारची इच्छा नसल्यामुळे हा पैसा दुसरीकडेच जातो’ असा गंभीर आरोपही मोदींनी यावेळी केला. उत्तर प्रदेशचे भाग्य बदलायचे असेल, तर येथील सरकार बदलण्याची गरज आहे, असे सांगत मोदींनी मतदारांना भाजपला मतदान करून सत्ता देण्याचे आवाहन केले. मोदींनी स्कॅम म्हणून उल्लेख केलेल्या पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या प्रत्युत्तराकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काही काळासाठी नितीशकुमार यांची वरात काढून त्यात ‘घोडे’ नाचवले जातील- सामना 

News Desk

रसायन शास्राचे नोबेल जाहीर

News Desk

भारतात ‘मोमो चॅलेंज’चा पहिला बळी

swarit
मनोरंजन

 नाना पाटेकर शहिदांच्या कुटुंबियांना मदत करणार

News Desk

मुंबई – रूपेरी पडद्यावरील नायकाला अपेक्षित काम प्रत्यक्षात सुरू केलंय अभिनेता नाना पाटेकर यांनी शहिद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याची इच्छा नाना यांनी व्यक्त केली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नाना यांनी मदतीसंदर्भात घोषणा केली आहे.

, ‘ भारतीय जवान कोणत्‍या परिस्थितीमध्‍ये काम करत असतात, हे सर्वांना ठाऊक आहे. त्‍यांचे कुटुंबही कोणत्‍या मनोभूमिकेत जगत असतील, याचा आपण विचार करु शकतो. विशेषत: शहिद झालेल्‍या जवानांच्‍या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवत असेल, म्‍हणूनच अशा कुटुंबियांसाठी नाम फाउंडेशन आता 10 कोटी रुपयांचा निधी जमा करणार आहे, असे नाना यांनी मुलाखती दरम्यान सांगितले.

इतकी मोठी रक्‍कम जमा करणे काही सोपे उद्दीष्‍ट नाही. मी वैयक्तिक 50 लाख रुपये देणार आहे. आणखी 9.50 लाख रुपये जमा करायचे आहे. म्‍हणून प्रत्‍येक भारतीयाला माझी विनंती आहे की, जवानांच्‍या सेवेसाठी जमेल तितकी मदत प्रत्‍येकाने करावी. सर्वांनी अगदी मनापासून नाम फाउंडेशनच्‍या मिशनमध्‍ये सहभागी झाले पाहिजे. जेणेकरुन जवानांसाठी आपण काहीतरी करु शकू.’

याव्‍यतिरिक्‍त नाना पाटेकर महाराष्‍ट्रातील दुष्‍काळ पिडीत शेतकऱ्यांसाठी नाम फाउंडेशनसोबत काम करत आहे. अनेक दुष्‍काळग्रस्‍त गावांत नाम फाउंडेशनने जलसंवर्धनाचे काम केले आहे. त्याचे सकारात्मक प्रतिसादही दिसू लागले आहेत.

 

Related posts

‘चुंबक’ ठरला उत्कृष्ट मराठी सिनेमा

News Desk

#मीटू : पेंटर जतिन दास यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप

Gauri Tilekar

ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार बडजात्या यांचे निधन

News Desk