HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रपतींच्या भाषणातून गांधी, नेहरू बाद

नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वंय सेवी संघाच्या विचारसरणीवर देशाचा कारभार कसा सुरू आहे, याचा प्रत्यय आपणास देशभरात सुरू असलेल्या विवध घटनांवरून येतच आहे. परंतु याच भर टाकली आहे, ती चक्क राष्ट्रपती यांनी. त्यांनी आपल्या भाषणात संघ परिवाला खूष करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जनसंघाचे संस्थापक दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याचा उल्लेख केला. यावरून विरोधकांचे पित्त खवळले आहे. राष्ट्रपतींनी देशाचा अवमान केल्याची टीका कॉँग्रेसने केली आहे. राष्ट्रपीता महात्मा गांधी, पंडीत जवाहर नेहरू यांचा साधी उल्लेखही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला नसल्याचे कॉँग्रेसने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

समाजवादी पक्षाच्या गृहकलहात तडजोड ?

News Desk

काय आहे #MeToo कशी सुरुवात झाली, तुम्हाला माहित आहे का ?

Gauri Tilekar

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

swarit
महाराष्ट्र

शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घ्यावेत – आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

News Desk

शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक व्हावी

मुंबई, “कर्जमुक्तीच्या घोषणा राज्य सरकारने केली असून त्याची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने व्हावी, कर्जमुक्तीची प्रक्रिया सदोष राहावी, यासाठी शिवसेनेचा लढा आहे, असा मुद्दा शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी मांडला. मात्र हे करत असतानाच ज्या शेतक-यांनी आंदोलनात सहभाग घेतला त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या,” अशीही मागणी त्यांनी केली. ऑनलाईन प्रक्रियेमुळे आज अनेक विद्यार्थी आणि सुशिक्षित पालकही हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शेतक-यांचे अर्ज ऑनलाईन घेण्याबरोबरच ऑफलाईनही घ्यावेत अशीही सूचना डॉ. गो-हे यांनी यावेळी केली.

राज्य सरकारच्या अभिनंदन ठरावावरील चर्चेच्यावेळी आ. डॉ. गो-हे यांनी शिवसेनेची भूमिका मांडतानाच राज्य सरकारला काही सूचनाही केल्या. कर्जमुक्तीची घोषणा ही डिहायड्रेटेड रुग्णाला दिलेल्या सलाईनसारखी आहे. अनेकशेतक-यांच्या मुलांना बँका शिक्षणासाठी कर्जही दिले जात नसल्याची वस्तुस्थितीत्यांनी यावेळी मांडली. मात्र भविष्यातही शेतक-यासाठी मानेने जगता यावे म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वामिनाथन आयोगाच्या अहवालातील शिफारशींसाठी आग्रही राहावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. कर्जमुक्तीच्याअंमलबजावणीसाठी जिल्हानिहाय आमदारांची सनियंत्रित समिती स्थापनकरावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. अनेक ठिकाणी महसूल स्तरावरचे लोक शेतक-यांकडून लाच घेत असतात, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालेला असतो, साठेबाजीमुळे शेतक-यांचेनुकसान होत असते, अशा परिस्थितीतजगण्यावरचा विश्वास उडालेल्या शेतकर्यामचा माणुसकीवरचा विश्वास जागवण्यासाठी राजकारण करण्यापेक्षा इमानदारीने काम करावे, असे आवाहनहीत्यांनी यावेळी केले. कर्जमुक्तीच्याअंमलबजावणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेनेचा पाठपुरावा असाच सुरू राहील, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

महिला शेतक-यांच्या कष्टाचेही मोल हवे.

सातबा-यावर महिलांचीही नावे हवीत म्हणून आंदोलन करण्यात आले होते. आता सातबा-यांवर शेतक-याच्या कुटुंबाची व्याख्या करून केवळ कुटुंबप्रमुखालाच लाभार्थी ठरवले आहे. मात्र महिला सुद्धा शेतात राबतात. त्यामुळे त्यांच्या मेहनतीचे मोल व्हावे म्हणून दोघांनाही लाभ मिळाला पाहिजे, अशीही महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी यावेळी केली.

Related posts

भाजपची तिरंगा एकता रॅली

News Desk

‘निवडणुकीला उभं करून पाडायचं षडयंत्र संजय काकांनींच रचलं’, भाजपाच्या माजी आमदाराचा खासदारावर गंभीर आरोप!

News Desk

विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध!– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna