HW News Marathi
देश / विदेश

गोध्रा हत्याकांडातील 11 दोषींनी फाशीऐवजी जन्मठेप सुनवली, विधानसभा निवडणुकीवर दिसणार परिणाम

गांधीनगरः केंद्रात व राज्यात भाजप सरकार आल्यानंतर यापूर्वीच्या सरकारने दोषी ठरवलेल्या किंवा शिक्षा सुनावलेल्या आरोपींची निर्दोष सुटका करण्याचा सपाटा या सरकारने लावला आहे. गेल्या काही दिवसांत मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची सुटका असो किंवा गोध्रा जळीतकांडातील आरोपींची सुटका असो. या सरकारचा आरोपींनी सोडण्याचा किंवा त्यांना मुक्त करण्यासाठी सत्तेत सहभागी झाल्याचा पुरावा मिळतो.

दरम्यान, सोमवारी गुजरात उच्च न्यायालयाने गोध्रा जळीतकांडाप्रकरणी ११ दोषींना फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोन महिन्यानंतर गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. हायकोर्टाच्या या निकालाने गोध्रा हत्याकांडाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. याचेच भांडवल करून हिंदू व्होटबँक आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा एकदा सुरू झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अबब.. 153 किलोचा समोसा पाहिला का?

News Desk

काँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या कैदेत

News Desk

‘सरोगसी’ मातांनाही २६ आठवडे मातृत्व रजा

News Desk