HW News Marathi
देश / विदेश

बोट उलटल्याने ११ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

हैदराबाद: विजयवाडा येथील नदीत बोट उलटल्याने ११ जणांचा मृत्यू झाला. पर्यटकांना घेऊन जाणारी ही बोट रविवारी पाचच्या सुमारास कृष्णा नदीमध्ये उलटून हा अपघात झाला. दरम्यान या बोटीतील विसजण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. बोट उलटल्यानंतर पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे बचाव पथकाने सांगितले. दरम्यान, काही जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. भवानी आयलँडला भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. रविवार असल्याने अनेकजण पर्यटनासाठी आले होते. हे सर्व पर्यटक प्रकाशम जिल्ह्यातील आहेत. एनडीआरएफ व काही पट्टीचे पोहणारे बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बेळगावमध्ये शिवरायांचा पुतळा काँग्रेस नेत्याने हटवलाय, शिवसेना राजीनामा देणार का ?”

News Desk

आमदार फोडण्यासाठी भाजपकडून प्रत्येकी २ कोटींचे आमिष !

News Desk

आम्ही फक्त तीनच राजांना मानतो ! प्रकाश आंबेडकरांचे नवे विधान

News Desk