HW News Marathi
देश / विदेश

छत्तीसगडमध्ये २०० गोमातांचा भूकबळी

छत्तीसगड – भाजपा सरकारकडून गोमातांच्या रक्षणासाठी मोठा गाजावाजा करीत अनेक योजना सुरू करण्यात येत असल्या तरीही, गोवंशाच्या मृत्यूचे प्रकार विविध ठिकाणी उघडकीस येत आहेत. त्यामुळे गोवंश बचावसाठी सरकार आता काय पावले उचलणार हे पाहाणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. छत्तीसगढमध्येही गेल्या काही दिवसांत तब्बल २०० गाईंचा भूकबळी गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे गोपालनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, छत्तीसगढमधील दुर्ग जिल्ह्यातील राजपूर येथे एका गोशाळेतील या दोनशेवर गायी चाऱ्याअभावी भूकबळी गेला आहे. विशेष म्हणजे ही गोशाला भारतीय जनता पक्षाचे नेते हरीश वर्मा यांच्या मालकीची असून, त्यांनी या प्रकरणाचे खापर राज्य सरकारवरच फोडले आहे.

गोशाळेजवळ अनेक खड्डे खणल्याचे माझ्या निदर्शनास आळे होते, त्यामुळे माझा संशय बळावला,’ असे राजपूरचे सरपंच पती सेवाराम साहू यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी गोशाळेजवळ जेसीबी मशिनद्वारे खड्डा खणण्याचे काम सुरू होते. मी त्याबाबत माध्यमांना माहिती दिली. आम्ही तेथे पोहोचताच गायींचे मृतदेह दिसले,’ असेही त्यांनी सांगितले. याची माहिती ग्रामस्थांकडून प्रशासनाला देण्यात आली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार महाराष्ट्रात ३०० कोटींची गुंतवणूक; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा जर्मनी दौरा फलदायी

Aprna

भारतात ‘मोमो चॅलेंज’चा पहिला बळी

swarit

जैन मुनी शांतिसागर यांना बलात्कार प्रकरणी अटक

News Desk