HW News Marathi
देश / विदेश

छत्तीसगडमध्ये २०० गोमातांचा भूकबळी

छत्तीसगड – भाजपा सरकारकडून गोमातांच्या रक्षणासाठी मोठा गाजावाजा करीत अनेक योजना सुरू करण्यात येत असल्या तरीही, गोवंशाच्या मृत्यूचे प्रकार विविध ठिकाणी उघडकीस येत आहेत. त्यामुळे गोवंश बचावसाठी सरकार आता काय पावले उचलणार हे पाहाणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. छत्तीसगढमध्येही गेल्या काही दिवसांत तब्बल २०० गाईंचा भूकबळी गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे गोपालनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, छत्तीसगढमधील दुर्ग जिल्ह्यातील राजपूर येथे एका गोशाळेतील या दोनशेवर गायी चाऱ्याअभावी भूकबळी गेला आहे. विशेष म्हणजे ही गोशाला भारतीय जनता पक्षाचे नेते हरीश वर्मा यांच्या मालकीची असून, त्यांनी या प्रकरणाचे खापर राज्य सरकारवरच फोडले आहे.

गोशाळेजवळ अनेक खड्डे खणल्याचे माझ्या निदर्शनास आळे होते, त्यामुळे माझा संशय बळावला,’ असे राजपूरचे सरपंच पती सेवाराम साहू यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी गोशाळेजवळ जेसीबी मशिनद्वारे खड्डा खणण्याचे काम सुरू होते. मी त्याबाबत माध्यमांना माहिती दिली. आम्ही तेथे पोहोचताच गायींचे मृतदेह दिसले,’ असेही त्यांनी सांगितले. याची माहिती ग्रामस्थांकडून प्रशासनाला देण्यात आली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लज्जास्पद सत्य म्हणजे अनेक भारतीय दलित, मुस्लीम, आदिवासींना माणूस समजत नाहीत – राहुल गांधी

News Desk

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध करताना शशी थरुर म्हणाले…

Darrell Miranda

#PulwamaAttack : शहीद जवानांना राजनाथ सिंह यांनी खांदा देऊन वाहिली श्रद्धांजली

News Desk
देश / विदेश

उत्तर प्रदेशातील भीषण रेल्वे अपघातात 23 ठार

News Desk

मुजफ्फरनगर :उत्तरेत झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने देशभरात थरकाप उडाला आहे. पुरी-हरिद्वार उत्कल एक्सप्रेस चे 14 डब्बे रुळावरून घसरून शनिवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला. यात 40 जण जखमी झाले आहेत. मुजफ्फर नगर जिल्ह्यात खतौली येथे झालेल्या या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना तत्काळ मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या. सुरेश प्रभू यांनी टिष्ट्वट करून, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती दिली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना मदत आणि बचावकार्याची देखरेख करण्यास सांगितले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या गाझियाबादमधून मदतीसाठी रवाना झाल्या आहेत. मेडिकल व्हॅनही येथे पोहोचल्या आहेत.

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Related posts

तुम्ही तुमचा जादुई व्यायामाचा दिनक्रम कायम ठेवा, कदाचित अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल !

swarit

#ElectionCommission : जाणून घ्या… पाच राज्याच्या मतदानाचे संपूर्ण वेळापत्रक

Aprna

दुचकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी केले गुजरातच्या बसवर हल्ला

News Desk