HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासांत २ हजारहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू

नवी दिल्ली | देशातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या १० हजार ९७४ ने भर पडली आहे. तर गेल्या २४ तासात २ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ६ हजार ९२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ५४ हजार ०६५ वर गेला आहे. त्यापैकी एकूण १ लाख ८६ हजार ९३५ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (१७ जून) दिली आहे.

देशात अनलॉक झाल्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत १ लाख ४६ हजार ४५० ची वाढ झाली आहे तर मृतांची संख्या ४ हजार ४१६ ने वाढली आहे. देशाचा रिकव्हरी रेट ५२.७९ टक्के झाला आहे. राज्यात काल कोरोनाच्या २ हजार ७०१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल (१६जून) राज्यात १ हजार ८०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ५७ हजार ८५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १३ हजार ४४५ इतकी झाली आहे. यापैकी ५० हजार ४४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याच्या महापौरांनी हॉटस्पॉट परिसराचा घेतला आढावा

News Desk

पुढच्या काही तासांत महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे स्पष्ट संकेत!

News Desk

“अहो, तुम्ही महाराष्ट्रातील नेते आणि महाराष्ट्राबरोबरच भांडताय…?”

News Desk