HW News Marathi
देश / विदेश

नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ भारतीय जवानांचा मृत्यु,ANI ची माहिती

दिल्ली | छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी चकमकीत तब्बल २२ जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘एएनआय’ ने दिलेलेयै वृत्तानुसार, काल चकमक झाली त्याच परिसरात आणखी 14 जवानांचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे आता या नक्षलवादी चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांचा आकडा 22 वर पोहोचला आहे.

काल शनिवारी सुरक्षा दल आणि पोलिसांची बिजापूरच्या तररेम जंगलात चकमक उडाली होती. तब्बल ३ तास याठिकाणी जोरदार धुमश्चक्री सुरु होती. यावेळी 21 जवान गायब झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी आज सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. मात्र, आता 21 पैकी 14 जवान मृत्यूमुखी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित सात जवानांचा शोध अजूनही सुरु आहे. काल या चकमकीत 8 जवान शहीद झाले होते. तर 24 जवान जखमी झाले होते. यापैकी 7 जवानांची प्रकृती गंभीर आहे.

मोदी आणि शरद पवारांचे ट्विट

या घटनेनंतर डीजी सीआरपीएफ कुलदीप सिंग हे छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. घटनेची माहिती घेण्यासाठी ते छत्तीसगडला जाणार आहेत. गृहमंत्रालयाने डीजींना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या घटनेत पाच जवान शहीद झाल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.शहीद जवानांना देश कधीच विसरणार नाही, असं म्हटलं आहे.तसेच राष्ट्रवादिचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मंगळवारी मुंबईत

swarit

साताऱ्याच्या प्रवीण जाधवचं ऑलिंपिकसाठी निवड, पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

News Desk

दिल्लीतील शेतकरी आज उपवास ठेवून साजरा करणार ‘सद्भावना दिवस’

News Desk