HW News Marathi
देश / विदेश

मुंब्र्यातून ४ तर औरंगाबादमधून ५ जण एटीएसच्या ताब्यात

मुंबई | इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून आज (२२ जानेवारी) मुंब्र्यातील कौसा, अमृतनगर येथून ४ जणांना तर औरंगाबादमधून ५ जणांना एटीएसकडून ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्वजण गेल्या अनेक दिवसांपासून एटीएसच्या रडारवर होते. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्वाची कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईत अथवा महाराष्ट्रात काही घातपाती कृत्य होण्याची शक्यता एटीएसला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

ताब्यात घेण्यात आलेले हे ९ जणांचे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंध असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या महिन्यात एनआयएकडून दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये १६ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. दिल्लीच्या जाफराबाद आणि उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये इसिस संघटनेशी संपर्कात असलेल्या ठिकाणांवर ही मोठी कारवाई करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीच्या कुटुंबात खडसेंचं स्वागत, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

ठाकरे सरकार पाण्यात हे बसलेल्या म्हशीसारखे आहे ! विनायक मेटेंचा घणाघात

News Desk

दक्षिण कोरियाने ८०० किलोमीटरची मारक क्षमता असलेल्या मिसाइलचे केले परीक्षण…

News Desk