HW News Marathi
Covid-19

आज रात्री ८ वाजता पंतप्रधान देशातील जनतेला संबोधित करणार

नवी दिल्ली | देशात सध्या कोरोनाच्या या संकटकाळाशी सामना करण्यासाठी तिसरा लॉकडाऊन सुरु आहे. ४ मेला सुरु झालेला हा तिसरा लॉकडाऊन १७ मेपर्यंत असणार आहे. मात्र, त्यानंतर काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (१२ मे) रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत. लॉकडाऊन संदर्भात कोणती मोठी घोषणा होणार का? किंवा कोणत्या मुद्द्यावर बोलणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान, काल (११ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या मुख्यंमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. यात देशातील कोरोनाची स्थिती काय आहे ही त्यांनी जाणून घेतली होती. त्यामूळे आज ते काय बोलणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर मुंबईत लॉकडाऊन करावाच लागेल”, पालकमंत्र्यांनी दिले संकेत

News Desk

ठाण्यातील बाळकुम-साकेत येथे १०२४ बेड्सचे कोविड-१९ रुग्णालय उभारले

News Desk

२३ जुलैपासून पुणेकरांना मिळणार लॉकडाऊनमधून दिलासा !

News Desk