HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या घोषणा

नवी दिल्ली | काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा यांनी आज (१५ मे) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ झाला. पत्रकार परिषद सुरू असतानाच अचानक एक व्यक्ती हातामध्ये तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देऊ लागली. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अजय सिंह बिष्ट म्हणणे भारतीय संस्कृतिचा अपमान असल्याचे देखील या व्यक्तीने म्हटले.

हाता तिरंगा घेऊन येणाऱ्या व्यक्तीचे नाव नचिकेता वाल्हेकर असून तो हिम्मतनगरचा रहिवासी असल्याची माहिती एएनआयने दिली आहे. हा तरुण भाजप कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना नचिकेता यांनी म्हटले की, ममता बॅनर्जी यांचे नाव घेण्याची यांच्यामध्ये (काँग्रेस) हिंमत नाही. हे लोक फक्त मोदी-शाह, मोदी शाह करत बसले आहेत. मोदी-शाह यांनी देशासाठी खूप काही केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे ‘राष्ट्रीयत्व’च धोक्यात, निवडणूक आयोगाची नोटीस

News Desk

‘वंदे भारत एक्‍स्प्रेस’ १५ फेब्रुवारीला धावणार

News Desk

माल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज सुनावणी

News Desk