HW News Marathi
देश / विदेश

Tarun Sagar Died | राष्ट्रसंत तरुण सागर यांच्याविषयी तुम्हाला हे माहित आहे का ?

नवी दिल्ली| जैन मुनी तरुण सागर यांचे आज वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाले. देशभरातून त्यांचे लाखो अनुयायी त्यांना श्रद्धांजली वहात आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार निधनापुर्वी काही दिवस त्यांनी अन्नत्याग केला होता.

जैन मुनी तरुण सागर यांच्या विषयी थोडक्यात

  • देशात खूप कमी लोकांना हे माहित आहे की राष्ट्रसंत तरुण सागर यांचे मुळ नाव पवन कुमार जैन असे होते.
  • तरुण सागर यांचा जन्म २६ जून १९६७ रोजी मध्यप्रदेशच्या दमोह जिल्ह्यात झाला. त्यांच्या आईचे नाव श्रीमती शांतीबाई जैन आणि वडीलांचे नाव प्रतापचंद्र जैन असे होते.
  • असे म्हटले जाते की वयाच्या १४ व्या वर्षी ते घर सोडून निघून गेले. ८ मार्च १९८१ रोजी त्यांनी घर सोडले गेले व सन्यास जीवन स्वीकारले. त्यांचे शिक्षण छत्तीसगडमध्ये झाले. त्यांच्या प्रवचनाचे सर्वत्र कौतुक केले जात असे. त्यांच्या प्रवचनांमुळे त्यांना ‘क्रांतिकारी संत’ हा सन्मान मिळाला आहे.
  • ६ फेब्रुवारी २००२ ला मध्य प्रदेश सरकार कडून त्यांना ‘राजकीय अतिथि’चा दर्जा प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर २ मार्च २००३ ला गुजरात सरकारने देखील त्यांना ‘राजकीय अतिथि’ म्हणून सन्मानित केले होते. ‘तरुण सागर’ यांनी ‘कड़वे प्रवचन’ या नावाने एक बुक सीरीज सुरू केली होती. त्यामुळे ते सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले.
  • त्यांच्या प्रवचनांना कडवट प्रवचन असे म्हटले जात असे कारण सामान्य जीवनाशी संबंधित गोष्टींबद्दल भाष्य करणारे प्रवचन ते देत असत. केवळ जैन धर्मातच नव्हे तर इतर समाजामध्येही त्यांच्या शिष्यांची संख्या लक्षणीय आहे.
  • २० जुलै १९९८ मध्ये राजस्थानच्या बागीडोरा येथे वयाच्या २० व्या वर्षी त्यांचे गुरु पुष्पदंत सागर यांनी त्यांना दिगंबर हे पद बहाल केले.
  • टीव्ही कार्यक्रम महावीर वाणी मधून ते अनेक लोकांपर्यंत पोहचले. त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होत गेली.
  • नेहमीच हिंसा आणि भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठविणारे तरुण सागर हे राजकीय नेत्यांशी देखील संबधित होते. जेथे इतर जैन मुनी राजकारणापासून दूर राहतात तर दुसरीकडे तरुण सागर सरकारी अधिकारी आणि नेत्यांचे प्रमुख पाहुणे म्हणून देखील उपस्थित रहात असत.
  • असे म्हटले जाते की लहानपणी त्यांनी गुरूवाणी ऐकली होती. ज्यामध्ये गुरुंनी त्याना म्हटले की आपण देखील ईश्वर होऊ शकतो. हे ऐकल्यानंतर तरुण सागर यांनी कालांतराने आपले घर सोडले. ते घरी म्हणाले की, त्यांना आचार्यांसोबत जाण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत ते अन्न पाणी ग्रहण करणार नाहीत.
  • एकदा टीव्ही मुलाखतीत ते म्हणाले होते त्यांना जिलेबी प्रचंड आवडते. २९ जुलै २०१२ रोजी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना ‘तरुण क्रांती पुरस्कार’ देऊन सन्मानित केले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळच्या पूरग्रस्तांना युएईनेकडून देण्यात येणारी ७०० कोटीची मदत अफवा

News Desk

“ड्रग्जचा खेळ गुजरातमधून तर सुरू झाला नाही ना?”; मलिकांचा भाजपला सवाल

News Desk

सैन्यात दलित आरक्षणासाठी पंतप्रधानांशी चर्चा – रामदास आठवले

News Desk