HW News Marathi
देश / विदेश

चांदनी ‘निखळली’ | अभिनेत्री श्रीदेवीचे निधन

दुबई | अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने चित्रपटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबई ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ५५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती बोनी कपूर आणि दोन मुली असा परिवार आहे. श्रीदेवी यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह दुबईत होत्या. तर दुसरी मुलगी जान्हवी चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे दुबईत गेली नव्हती. श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीस सुरूवात केली. तामिळ, तेलगू, मल्याळम चित्रपटांत त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या. ज्यूली या चित्रपटात श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. ‘सोलावा सावन’ (१९७८) साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात श्रीदेवी यांनी नायिकेची भूमिका साकारत मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘हिंमतवाला’, ‘मवाली’, ‘मास्टरजी’, ‘मकसद’, ‘मिस्टर इंडिया’, ‘चांदणी’ आदी चित्रपटात त्यांनी साकारलेल्या विनोदी धाटणीच्या भूमिकेचे कौतुक झाले. श्रीदेवी यांनी ‘सदमा’ सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात साकारलेली भूमिका चाहत्यांच्या मनात कायम आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न !

News Desk

मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँग्रेस रोखू शकतो – पृथ्वीराज चव्हाण

News Desk

रतन टाटा, मुकेश अंबानी यांसह १० उद्योगपती अयोध्येत भूमिपूजनाला लावणार हजेरी

News Desk
मुंबई

बेस्ट, रेल्वे, मोनो आणि मेट्रो वाहतुकीसाठी एकच तिकीट

News Desk

मुंबईकरांसाठी खुशखबर…! बेस्ट, रेल्वे, मोनो आणि मेट्रो या सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात येणार आहे. या प्रणालीचा पहिला टप्पाचे काम १ मार्चपासून सुरू करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुंबई, ठाणे, मिरा भाईदर आणि नवी मुंबईमधील परिवहन सेवांसाठी एकच तिकीट असणार आहे. ही तिकीट प्रणाली अकाऊंटबेस स्मार्ट कार्डच्या रुपात असून त्यामध्ये कुठेही रिजार्च करता येणार आहे. प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, सार्वजनिक वाहतुकीला चालणार मिळणार आहे. या प्रणालीच्या कार्यचलनासाठी विषेश वहन कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात बेस्ट, मोनोरेल आणि रेल्वेसाठी ही तिकीट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मेट्रो आणि इतर सार्वजिनक वाहतूक सेवांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यानंतर वाहनतळ, टॅक्सी आणि रिक्षा यांचाही समावेश या प्रणालीत करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे प्रवाशांना वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असल्यामुळे या निर्णयाचे मुंबईकरांनी स्वागत केले आहे.

केजरीवाल सरकारने पहिल्यांदा मेट्रो आणि बस एकाच कार्ड जारी केले आहे. मेट्रो आणि बसचा प्रवास एकाच कार्डने करता येणार आहे. या कार्डाचा वापर विविध मार्गावर चालणाऱ्या २०० डीटीसी बस आणि ५० क्लस्टर बसशिवाय मेट्रोमध्येही चालते. दिल्ली हे देशातील पहिले शहर आहे की, ज्यात कॉमन मॉबिलिटी कार्डचा वापर होईल. येत्या १ एप्रिलपासून या कार्डचा वापर करण्यात येणार आहे.

Related posts

कामगार रुग्णालयाला पुन्हा एकदा आग

News Desk

देवदत्त धनोकर यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

News Desk

शक्ती मिल बलात्कारप्रकरणी आरोपींना फाशी शिक्षा कायम | मुंबई उच्च न्यायालय

News Desk