HW News Marathi
देश / विदेश

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन पुर्णपणे उघडणार नसल्याचे पंतप्रधानांनी दिले संकेत

नवी दिल्ली | कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनकरुनही देशातील कोरोनाची स्थिती स्थिर होत नाही आहे. त्यामूळे १४ एप्रिलला लॉकडाऊन संपणार की नाही याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मात्र पंतप्रधानांसोबत बैठकीत सहभागी झालेल्या बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांनी याबाबत खुलासा केला आहे. पंतप्रधानांनी १४ तारखेनंतर लगेचच पूर्णपणे लॉकडाउन हटवणार नसल्याचे सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊतदेखील उपस्थित होते. पी.टी.आय वृत्त संस्थेने ट्विटही केले आहे.“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलनंतर एकाच वेळी पूर्णपणे लॉकडाउन हटवला जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे”. तसंच करोनाच्या आधीचं आणि नंतरचं आयुष्य सारखं नसणार आहे असे, मोदींनी म्हटले असल्याची माहिती पिनाकी मिश्रा यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आज (८ एप्रिल) नरेंद्र मोदींनी लोकसभा आणि राज्यसभेत पाचपेक्षा जास्त सदस्य असणाऱ्या संसदेतील नेत्यांसोबत चर्चा केली. यावेळी नरेंद्र मोदींनी सर्वांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार काय पावले उचलत आहे यासंबंधी माहिती दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात 59 टक्के मतदान

Aprna

लातूरमधून जम्मू-काश्मीरचे ४ जण ताब्यात, दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय

News Desk

“FPO मागे, भविष्यातील योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही”, गौतम अदानींचे आश्वासन

Aprna