HW News Marathi
देश / विदेश

एअर इंडियाच्या विमानातील क्रू मेंबर्सना ‘जय हिंद’ बोलणे बंधनकारक

नवी दिल्ली | एअर इंडियाच्या सर्व विमानांमधील क्रू मेंबर्सना प्रत्येक उड्डाणाच्या घोषणेनंतर ‘जय हिंद’ची घोषणा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाची तातडीने अंमलबजाणी करण्यात येणार आहे. जय हिंद बोलण्यात येणार असल्याची माहिती एअर इंडियाचे संचालक (ऑपरेशन्स) अमिताभ सिंग यांनी दिली आहे.

याआधी देखील एअर इंडियाचे तत्कालीन चेअरमन अश्वनी लोहानी यांनी मे २०१६ मध्ये आपल्या वैमानिकांना ‘जय हिंद’ बोलण्याच्या सूचना दिल्या होत्या. एअर इंडियातील केबिन क्रू आणि कॉकपिट क्रू प्रत्येक उड्डाणाच्या घोषणेनंतर ‘जय हिंद’ बोलणार आहेत. गेल्‍या काही दिवसात भारत आणि पाकिस्‍तानमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. त्‍या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : चीन सीमावादात नेहमी ‘या’ पाच रणनितीचा वापर करते !

News Desk

निर्भया प्रकरणात सोनिया गांधींच अनुकरण करा…

swarit

Goa Elections : मोठी बातमी! उत्पल पर्रिकर पणजीतून अपक्ष निवडणूक लढवणार

Aprna