HW News Marathi
देश / विदेश

युक्रेनमध्ये झालेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

नवी दिल्ली | गेल्या सहा दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेला भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. युक्रेनच्या खारकिव्हमध्ये रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव नवीन शेखरप्पा असे असून हा कर्नाटकमधील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. 

दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत ७ विमान युक्रेनमधून अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशात आणले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (२८ फेब्रुवारी) उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांसोबत समन्वय साधण्यासाठी पंतप्रधांनी केंद्रातील चार मंत्री युक्रेन लगतच्या देशात जाणार आहेत.  यात केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू आणि जनरल व्ही.के.सिंह हे चार मंत्री युक्रेन लगतच्या देशात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

दरम्यान, रशिया-युक्रेनच्या सैन्याकडून सतत गोळीबार, बॉम्बहल्ले आणि मिसाईल हल्ले होत आहेत. यात दोन्ही देशाचे नागरिक मारले गेले आहे. युक्रेनची राजधानी किव्हमधील दूतावासतमध्ये आश्रयाला असलेल्या तब्बल ४०० विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात यश आले आहेत. तर आतापर्यंत १००० जणांचे स्थलांतर झाले असून अजहूनही काही भारतीय विद्यार्थी किव्हमध्ये अडकले आहेत. सध्या किव्हमध्ये कर्फ्यू उठवताच विद्यार्थांनी पश्चिम सीमेकडे जाण्यास सांगितले आहे.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी अमोल कोल्हेंची केंद्राकडे धाव

News Desk

हार्दिक पंड्यांचे आक्षेपार्ह ट्विटबाबत स्पष्टीकरण

News Desk

भिकाऱ्यांपुढे दुसरा पर्याय काय असू शकतो, सामनातून पाकिस्तानवर टीका

News Desk