HW News Marathi
देश / विदेश

अण्णांच्या आंदोलनाला संघाची फूस | हार्दिक पटेल

नवी दिल्ली | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामागे संघाची फूस असल्याचा सनसनाटी आरोप पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने केला आहे. गेल्या चार दिवसांपासून रामलीला मैदानावर अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत.

शनिवारी हार्दिक पटेल अण्णांच्या भेटीसाठी जाणार होता. मात्र हार्दिकला व्यासपीठावर येऊ न देण्याची भूमिका अण्णांनी घेतली. त्यानंतर डिवचल्या गेलेल्या हार्दिक पटेलने अण्णांवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठवली. शेतकऱ्यांनी आंदोलन स्वत:च्या हातात घेतल्याने सरकार अस्वस्थ आहे.

त्यामुळे हा आक्रोश शांत करण्यासाठी आंदोलन संघाच्या हातात देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप हार्दिक पटेलने केला. मला जी माहिती मिळाली त्यानुसार अण्णा मला मंचावर येऊ देणार नव्हते. पाठीमागेच भेटणार होते. पण मुळात आमच्यासारख्या आंदोलकांना का दूर ठेवत आहेत?

विरोधी पक्षांच्या आंदोलनातल्या सहभागावर अण्णांचा इतका आक्षेप का? मागच्या आंदोलनात विरोधी पक्ष नव्हते का? मग आताच इतकी टोकाची भूमिका का? तुम्ही जे मुद्दे उचलत आहात, त्याला विरोधी पक्षांचीही साथ असेल तर त्यांची इतकी अॅलर्जी का?”,असे प्रश्न हार्दिकने अण्णांना विचारले आहेत. तसेच, दिल्लीवाल्यांच्या इशाऱ्यावर मला काल येऊ दिलं नाही, असा आरोपही हार्दिकने केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आम्ही कलम ३७१ ला हातही लावणार नाही, अमित शाहांचे आश्वासन

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

News Desk

रुग्णालयाने हाकलल्याने तिने रिक्षात दिला बाळाला जन्म

News Desk
मुंबई

भिडे गुरुजींच्या अटकेचा प्रश्न विधानसभेत

News Desk

मुंबई | भि़डे गुरुजींना वाचवण्याची सरकारची भूमिका आहे. प्रकरण गंभीर असताना सरकार मात्र दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोपी विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

दरम्यान, महाराष्ट्रात अतिशय गंभीर प्रसंग घडत आहे. भिडे कार्यक्रम घेतात. पत्रकार परिषदा घेतात. परंतु पोलिसांनी ते सापडत नाहीत. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. सरकार त्यांना पाठिशी का घालत आहे, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमकपणे विधानसभेत मांडला.

Related posts

संविधान बदलू देणार नाही

News Desk

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेननप्रमाणे भिडे, एकबोटेवर कारवाई कराः प्रकाश आंबेडकर

News Desk

Breaking News | चेंबूर मधील बीपीसीएल मध्ये स्फोट

News Desk