HW News Marathi
देश / विदेश

#Article370Abolished : सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या ८ याचिकेवर आज सुनावणी

नवी दिल्ली | जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविण्याला आव्हान देणाऱ्या जवळपास ८ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. या सर्व याचिकांवर आज (१६ सप्टेंबर) न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेत कलम ३७० हटविणे, जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट आणि काश्मीरमध्ये लावलेल्या निर्बंध यांना आव्हान देणात आले आहे.

या ८ एक याचिका काँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांचीही याचिका आहे. आझाद यांना स्वत:च्या राज्यात म्हणजे काश्मीरात जाण्याची परवानगी मागितली आहे. या याचिकांवर मुख्य सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायाधीश एस.ए बोबडे, न्या. एस अब्दुल नजीर यांचे खंडपीठ सुनावणी करणार आहे. जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फेरन्स पक्षाचे प्रमुख सज्जाद लोन यांनी कलम ३७० हटविणे आणि राज्याचे पूर्नविभाजान याला न्यायालयात आव्हान दिले आहे.

राज्यसभा सदस्य आणि एमडीएमकेचे संस्थापक वाइको यांच्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुला यांना न्यायालयासमोर हजर करण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या याचिकेत करण्यात आली आहे. कलम ३७० हटविण्यासाठी काश्मीरमधील नेत्यांना कैदेत ठेवण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#CoronaVirus | ३१ मार्चपर्यंत भारतीय रेल्वे बंद !

Arati More

Tarun Sagar Died |तरुण सागर यांचे निधन, पंतप्रधनांनी ट्विटरद्वारे वाहिली श्रद्धांजली

News Desk

#COVID19 : देशातील ‘या’ राज्यात ‘लॉकडाऊन’ ३० एप्रिलपर्यंत वाढवला

News Desk