HW News Marathi
देश / विदेश

#Article370Abolished : पाकिस्तानचा जळफळाट, भारताविरोधात घेतले ३ मोठे निर्णय

नवी दिल्ली | भारताने जूम्म-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा जळफटा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (७ ऑगस्ट) त्यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर पाकिस्ताने तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.

पाकिस्ताने कलम ३७० रद्द केल्यानंतर घेतले हे निर्णय

  • पाकिस्ताने भारतासोबतचे सर्व व्यापरी संबंध तोडले आहे
  • भारत सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द, यासंबंध पाकिस्तान संयुक्त राष्ट्र संघात जाणार असल्याचे सांगितले
  • पाकिस्तानमधील भारताच्या उच्चायुक्तांना भारतात परत पाठविणार आणि नवी दिल्लीतील आपल्या उच्चायुक्तांना पाकिस्तानमध्ये परत बोलवणार आहे.

या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये भारतासोबत मुत्सद्दी संबंध डाऊनग्रेड केले जातील. भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापार संबंध तोडण्यात येतील. तसेच, बैठकीत भारतासोबत द्विपक्षीय संबंध व व्यवस्थांचा (समझौता) आढावा घेतला जाईल आणि हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात मांडला जाणार असून पाकिस्तानमधील भारताच्या उच्चायुक्तांना भारतात परत पाठविणार आणि नवी दिल्लीतील आपल्या उच्चायुक्तांना पाकिस्तानमध्ये परत बोलवणार आहे. यानुसार, भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना भारतात परत जाण्यास पाकिस्तानने सांगितले आहे. याशिवाय, १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाकिस्तान साजरा करेल, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर प्रदेश सामूहिक बलात्कारातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू

News Desk

लष्करी अधिकारी मारवाहला हनी ट्रॅपच्या जळ्यात

News Desk

पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदीदरम्यान ४ संशयित ताब्यात

News Desk