HW News Marathi
देश / विदेश

#Article370Abolished : कलम ३७० हटविण्यासाठी ३७० मते

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन विधेयक आज (६ ऑगस्ट) लोकसभेत मंजूर झाले आहे. अखेर हे विधेयक लोकसभेत ३७० कलम विरुद्ध ३७० अशी मते मिळून ऐतिहासच रचला गेला आहे. आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर करताना तीन वेळा मतदान करून एक अनोखा इतिहासच रचला. त्याचबरोबर लोकसभेत ३७० विरुद्ध ७० मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आले.

लोकसभेत मशीनद्वारे या विधेयकावर मतदान करण्यात आले. या विधेयकांवर मतदान करताना मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकसभेत तीन वेळा मतदान घेण्यात आले. या पहिल्या वेळेस झालेल्या मतदानात ३५१ विरुद्ध ७२ मते, तर दुसऱ्या मतदानात ३६७ विरुद्ध ७० मते मिळाली आहे. तर शेवटी आणि तिसऱ्या वेळेस घेण्यात आलेल्या मतदानात ३७० विरुद्ध ७० मते मिळत अखेर हे विधेयक पास झाले. १९५२ नंतर सर्वात जास्त विधेयक ३६ विधयेक पास झाले असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याची घोषणा केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंगळूरुमध्ये लढाऊ विमानाचा अपघात, दोन वैमानिकांचा मृत्यू

News Desk

थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट? भाजपविरोधातील पुढील रणनीती ठरणार

News Desk

अर्थमंत्री मॅडम, एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते? – सामना

News Desk