HW News Marathi
देश / विदेश

आपला मुलगा माणून माझ्यावर विश्वास टाकला !

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीच्या शर्यतीत भाजप, आप आणि कॉंग्रेसमध्ये चुरस होती. मात्र, आपने ६३ जागांवर विजयी मुसंडी मारत एकहाती सत्ता मिळवली आहे.तर भाजपला ७ जागा मिळाल्या असून त्यांचा दारुन पराभव झाला आहे. शिवाय आश्चर्याची बाब म्हणजे ज्या दिल्लीत गेली १५ वर्षे शिला दिक्षितांचे राज्य होते तिथे कॉंग्रेसला एकही खाते उघडता आले नाही. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची मुख्यमंत्री पद भूषवण्याची हॅट्रिक केली आहे.अरविंद केजरीवाल यांनी विजयानंतर दिल्लीकरांचे मनापासून आभार मानले आहेत.

‘आप’वर दाखवलेल्या विश्वासाबबद्दल मी दिल्लीकरांचे आभार मानतो. हा माझा विजय नसून दिल्लीतील जनतेचा विजय आहे, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले. ही एका नव्या राजकारणाची सुरवात असून वीज, शिक्षण,आरोग्य आदी कामाचा विजय असल्याचेही ते म्हणाले. दिल्लीच्या जनतेने मला त्यांचा मुलगा समजून विश्वास दाखवला आणि मी एकटा दिल्लीचा विकास करु शकत नाही मला तुमच्या साथीची गरज आहे असे म्हणत केजरीवालांनी दिल्लीकरांची साथ मागितली. तसेच आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे आणि दिल्लीच्या जनतेने आम्हाला विजयी करत हीच भेटवस्तून दिली असे म्हणत जनतेचे आभार मानले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची तातडीची बैठक

News Desk

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या अंगावर टाकला काळा कपडा

News Desk

गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वादग्रस्त सरदार सरोवराचे मोंदीच्या हस्ते लोकार्पण

News Desk