HW News Marathi
देश / विदेश

अयोध्या प्रकरणी आजपासून नियमित सुनावणी

नवी दिल्ली। अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी आजपासून (६ऑगस्ट) नियमित सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कारण न्यायालयाने स्थापन केलेल्या मध्यस्थ समितीच्या माध्यमातून या वादावर तोडगा निघला नाही. अयोध्या प्रकरणात मध्यस्थ समिती अपयशी ठरली. त्यामुळे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या खंडपीठाने आजपासून अयोध्या जमीन वादावर नियमित सुनावणी सुरू होणार असल्याचा निर्णय २ ऑगस्टला न्यायालयाने घेतला आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सुनावणी सुरूच राहणार असल्याचे देखील न्यायायाने म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर २०१९ला निवृत्त होणार आहेत. न्यायालयच्या साधारण परंपरानुसार ज्या खंडपीठाकडे प्रकरण येते. त्याच खंडपीठाच्या कालावधीत निकाल लागतो. त्यामुळे ६ ऑगस्टला हे प्रकरण सरन्यायाधीशांचा समावेश असलेल्या खंडपीठाकडे आले आहे. तर त्याचा अर्थ त्यांच्या निवृत्तीआधी खटल्याचा निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जाते.

अयोध्या प्रकरणात ३० सप्टेंबर २०१० रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला होता. यावेळी न्यायालयाने वादग्रस्त जमीन तीन भागांमध्ये वाटण्याचा निकाल दिला होता. यापैकी दोन तृतीअंश जमीन राम मंदिरासाठी आणि एक तृतीअंश जमीन सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या निकाला दोन्ही पक्षकारांना अमान्य होता. त्यानंतर गेल्या आठ-नऊ वर्षात सर्वोच्च न्यायालयात त्यासंदर्भातली मोठी घडामोड घडलेली नाही. त्यामुळे आता ६ ऑगस्टपासून सुरु होणारी ही सुनावणी देशाला अयोध्या प्रश्नावरचे अंतिम उत्तर कधी देते याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. के. धवन यांचे निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

News Desk

लोकसभेचे वेळापत्रक आज सायंकाळी जाहीर होणार  

News Desk

डोनाल्ड ट्रम्प देशात आणीबाणी लागू करण्याच्या विचारात ?

News Desk