HW News Marathi
देश / विदेश

Ayodhya Verdict : सर्वोच्च न्यायालयात आज ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी

नवी दिल्ली | अयोध्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणाची सुनावणी आज (२६ फेब्रुवारी) होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनवाणी होणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी ही माहिती दिली आहे. सकाळी १०.३० वाजत या सुनावणीला सुरुवात होईल. यापूर्वी २९ जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार होती.

२९ जानेवारीच्या सुनावणीसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या घटनापीठातील न्या. एस. ए. बोबडे अनुपस्थित होते. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. रंजन गोगोई यांनी २५ जानेवारी नव्या पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना केली होती. या ५ सदस्यीय घटनापीठात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती अशोक भुषण, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, आणि न्यायमूर्ती अब्दुल नाझीर यांचा समावेश करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोणत्या ठिकाणी आधार कार्ड गरजेचे

swarit

#PulwamaAttack : देशभरातील ‘या’ जवानांनी पत्करले वीरमरण

News Desk

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची लिफ्ट अवघ्या १५ दिवसात बंद

News Desk
देश / विदेश

देशातील ‘या’ ५ विमानतळांची जबाबदारी आता अदानीकडे

News Desk

नवी दिल्ली । देशातील पाच विमानतळांची जबाबदारी आता अदानी समूहाकडे असणार आहे. केंद्राने राबविलेल्या सहा विमानतळांच्या खासगीकरणाच्या निविदा प्रक्रियेतील पाच विमानतळांच्या संचालनाची बोली अदानी समूहाने जिंकल्याने त्यांच्याकडे या पाच विमानतळांची जबाबदारी असणार आहे.

अहमदाबाद, तिरुवनंतपूरम, लखनौ, मंगळुरू आणि जयपूर या विमानतळांच्या संचलनाची जबाबदारी आता अदानी समूहाकडे असणार आहे. या विमानतळांचे खाजगीकरण होणार असल्याने येथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळू शकणार आहेत. ही पाच विमानतळे औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर अदानी समूहाकडे सोपविण्यात येणार आहेत.

२०१८ साली नोव्हेंबरमध्ये सरकारकडून सहा विमानतळांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारीसाठी एका प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी अहमदाबाद आणि जयपूर विमानतळासाठी ७, लखनौ आणि गुवाहाटीसाठी ६ निविदा, तर मंगळुरू आणि तिरुवनंतपूरमसाठी ३ निविदा प्राप्त झाल्या होत्या.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ६ वाजता देशवासियांना संबोधित करणार!

News Desk

गोरखा जनमुक्तीदेखील एनडीएमधून बाहेर पडणार, भाजपला आणखी एक धक्का

News Desk

कलबुर्गी हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीकडून एकाला अटक

News Desk