HW News Marathi
देश / विदेश

मराठी माणसामुळे त्रिपुरात भाजपची सत्ता

ईशान्य भारतातील त्रिपुरामध्ये भाजपला ४० जागांवर विजयी मिळवून स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर मार्क्स वादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम) ला १९ जागांवर निवडूण आली. सीपीएमला टक्कर देणे हे भाजपसाठी काही सोपे नव्हते. म्हणून भाजपने सुधीर देवधर यांना त्रिपुराची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी शुन्यातून पक्ष्यांची बांधणी केली.

सुधीर देवधर यांचा जन्म पुण्यात झाला. गेली १२ वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ईशान्य भारतात काम केले होते. देवधर यांनी ‘माय होम इंडिया’ नावाची संस्था स्थापन केली. यांच्या माध्यमातून मेघालयातील स्थानिक खासी आणि गारो समाजातील तरुणांशी संवाद साधून तरुणपिढीपर्यंत मोदींचे विचार पोहचविले.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी संघाची जबाबदारी दिली होती. तेव्हा देवधर यांनी बूध बांधणी केल्यामुळे मोदी जिंकल्याचे म्हटले जाते. वाराणसीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यामुळे त्यांना त्रिपुरात मोदींनी पाठवल्याचे म्हटले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ग्लोबल टीचर पुरस्कारा’मुळे भारताची मान उंचावली । दत्तात्रय भरणे

News Desk

आज नॅशनल फूड डे, भारताचा राष्ट्रीय अन्नपदार्थ कोणता ?

Gauri Tilekar

पैसा व सत्तेने सर्व काही मिळविता येत नाही

News Desk