HW News Marathi
देश / विदेश

भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदी देखील त्रस्त

नवी दिल्ली | भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदी देखील त्रस्त आहेत. अनेकदा भाजपचे हे वाचाळवीर माध्यमांसमोर नको ते वक्तव्य करुन पक्षाची प्रतिमा डागाळत असल्याचे लक्षात येताच पंतप्रधान मोदींनी अशा महाशयांना नमो अॅप च्या माध्यमातून संवाद साधत खडे बोल सुनावले आहेत.

यावेळी बोलताना मोदी म्हणालेत अनेकदा पक्षातल्या नेत्यांना पुरती माहीती नसते तरीही ते नको ते बरळतात त्यामुळे प्रसिद्धी माध्यमांना प्रकरण लावून धरायला संधी मिळते यात माध्यमांची चूक नसून संपूर्ण चूक पक्षातल्या नेत्यांची आहे. कॅमेरा दिसला की कसली कल्पना नसतानाही अनेक लोक बोलतात त्यांना अधिकृत अनधिकृत वक्तव्याचे देखील भान रहात नाही. त्यामुळे पक्षाची प्रतिमा बिघडते असेही ते म्हणाले.

पक्ष उत्तम काम करत असून सर्व स्तरातील जनतेपर्यंत पोहचला आहे नेत्यांनी त्याचे भान ठेवणे गरजेचे आहे. शांतता आणि एकोपा टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी मोदींनी भाजपच्या सर्व नेत्यांना केले आहे.

 

Related posts

दिल्ली, उत्तर प्रदेशसह उत्तराखंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

Aprna

देशातील स्वच्छतेच्या कामासाठी मी कायम तुमच्यासोबत !

News Desk

Ayodhya Verdict : ५ सदस्यीय खंडपीठात ३ मराठी न्यायाधीशांचा समावेश

News Desk