HW News Marathi
देश / विदेश

भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदी देखील त्रस्त

नवी दिल्ली | भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदी देखील त्रस्त आहेत. अनेकदा भाजपचे हे वाचाळवीर माध्यमांसमोर नको ते वक्तव्य करुन पक्षाची प्रतिमा डागाळत असल्याचे लक्षात येताच पंतप्रधान मोदींनी अशा महाशयांना नमो अॅप च्या माध्यमातून संवाद साधत खडे बोल सुनावले आहेत.

यावेळी बोलताना मोदी म्हणालेत अनेकदा पक्षातल्या नेत्यांना पुरती माहीती नसते तरीही ते नको ते बरळतात त्यामुळे प्रसिद्धी माध्यमांना प्रकरण लावून धरायला संधी मिळते यात माध्यमांची चूक नसून संपूर्ण चूक पक्षातल्या नेत्यांची आहे. कॅमेरा दिसला की कसली कल्पना नसतानाही अनेक लोक बोलतात त्यांना अधिकृत अनधिकृत वक्तव्याचे देखील भान रहात नाही. त्यामुळे पक्षाची प्रतिमा बिघडते असेही ते म्हणाले.

पक्ष उत्तम काम करत असून सर्व स्तरातील जनतेपर्यंत पोहचला आहे नेत्यांनी त्याचे भान ठेवणे गरजेचे आहे. शांतता आणि एकोपा टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी मोदींनी भाजपच्या सर्व नेत्यांना केले आहे.

 

Related posts

विजय मल्ल्याचे भारतात येणे लांबणीवर?

News Desk

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश

News Desk

सरन्यायाशीध आणि न्यायमूर्ती यांच्या वादा मिटला

swarit
राजकारण

५० वर्षे सत्ता टिकविण्याचा संकल्प करा |अमित शहा

News Desk

नवी दिल्ली | भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी येत्या ५० वर्षात सत्तेत रहाण्याचे स्वप्न पहा असा सल्ला भाजप कार्यकर्त्यांना दिला. शहा रविवारी गाझियाबाद येथील सभेत बोलत होते. राजकारणातील विजयाचा संकल्प केवळ पाच दहा वर्षांपूरता ठेऊ नका तर अगामी ५० वर्षात भाजपलाच सत्तेत ठेवण्याचा संकल्प करा. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कॉंग्रेसने सत्ता टिकवली तसेच सत्तेत टिकून रहाण्यासाठी काम करा असे आवाहन अमित शहा यांनी कार्यकर्त्यांनी यावेळी केले.

अमित शहा पुढे म्हणाले, ‘सत्तेत आल्यापासून भाजपने असे कोणतेही काम केलेले नाही ज्यामुळे पक्षातील नेत्यांना अपमान सहन करावा लागेल. सध्या सर्वांनी फक्त निवडणूकीपर्यंतचा विचार न करता देशाच्या विकासासाठी जीव ओतून काम करण्याची गरज आहे. भाजप सरकारच्या कामामुळे नेहमीच सर्वजण ताठ मानेने काम करु शकतात असेही शहा यावेळी बोलताना म्हणाले.’

 

Related posts

मध्य प्रदेशात कमलनाथ तर राजस्थानमध्ये कोण ?

News Desk

यंदा भीमा-कोरेगाव विजय दिवसासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

News Desk

प्रियांका चतुर्वेदी आज शिवसेनेत प्रवेश करणार

News Desk