HW News Marathi
देश / विदेश

आज निवडणुका झाल्यास भाजपचा पराभव !

बंगळुरू- प्रचंड पैसा टाकून तसेच देशातील विविध माध्यमांच्या मालकांना हाताशी धरून भाजपने कॉँग्रेसमुक्त भारतचा विडा हाती घेतला आहे. परंतु भाजपच्या या प्रयत्नांना धक्का देणारे वृत्त कर्नाटकमधून हाती येत आहे. येथे आज निवडणुका झाल्यास कॉँग्रेस विजयी होईल, असा अंदाज सी फोर या संस्थेने व्यक्त केला आहे. हा अंदाज देशासाठी नसून केवळ कर्नाटक राज्यासाठी आहे. भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. परंतु त्यांना बहुमत मिळणे कठीण जाणार असल्याचे सी फोरने म्हटले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सी फोरने एकूण 165विधानसभा मतदारसंघातील 24 हजार 676 मतदारांची मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सूरू केलेली अन्न भाग्य स्कीम मतदारांना प्रचंड आवडली असल्याचे सर्व्हेमध्ये प्रामुख्याने समोर आले आहे. दरम्यान, दक्षिणेत झेंडा रोवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी शहा यांनी दौरा निश्चित केला होता परंतु हा सर्वे आल्यानंतर त्यांनी तीन वेळा कर्नाटकचा दौरा रद्द केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

१५ हजार महिलांची सुरक्षित प्रसूती करणाऱ्या पद्मश्री सुलागिट्टी नरसम्मा यांचे निधन

News Desk

स्वयंघोषित संत रामपालला दोन हत्या प्रकरणात जन्मठेप

swarit

मुंबईत कोरोनाधितांच्या आकड्यात ‘कृत्रिम’ घट, फडणवीसांचा आरोप

News Desk
Uncategorized

आता घाटी रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू

News Desk

औरंगाबाद-येथील घाटी रुग्णलायतील प्रसूती विभागात रविवारी रात्री तीन बालकांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नातेवाईकांना गोरखपूर घटनेची आठवण झाली. मृत बेगमपुरा स्मशानभूमीत सोमवारी सकाळी सहा वाजता एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही विदारक घटना पाहून रोज सरणाची व्यवस्था करणाऱ्या स्मशानजोगीच्याही डोळ्यात पाणी आले.

रविवारी मृत्युमुखी पडलेल्या तीन बालकांत दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. माया मुकेश मगरे (३०, रा. ब्रिजवाडी), पूजा पांडुरंग बखले (रा. डोंगरगाव, ता. अंबड), अर्चना विनायक मुंढे (३०, रा. धावणी मोहल्ला) अशी मृत्युमुखी पडलेल्या नवजात शिशूंच्या आईची नावे आहेत. विनायक मुंढे (३६) त्याची पत्नी अर्चना हिला रविवारी सातच्या सुमारास अचानक कळा येऊ लागल्या. त्याने तिला तत्काळ घाटीतील प्रसूती विभागात दाखल केले. सात वाजून ४० मिनिटांनी अर्चना प्रसूत झाली. मात्र मुलगा झाला आहे की मुलगी हे त्याला कोणीच सांगितले नाही. पुरुषांना प्रसूती विभागात प्रवेश नसल्यामुळे त्याला बाहेरच थांबावे लागले. अखेर सकाळी सहा वाजता विनायकच्या हातात मृत बाळ ठेवण्यात आले. माझ्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला? असे तो घाटीतील कर्मचाऱ्यांना विचारत होता. मात्र, त्याला उत्तर मिळाले नाही. काही मुले जन्मल्यानंतर केवळ पंधार मिनिटे जगतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

Related posts

Abhinandan Varthaman | विंग कमांडर अभिनंदन भारतीय सेवेत रुजू, सेल्फी काढण्यासाठी सहकाऱ्यांचा गराडा

News Desk

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रवास आता प्रबोधनकार ठाकरेंच्या शिवसेनेकडे !

Arati More

लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडण, पुढं जाऊन संसार कसा होणार ?

News Desk