HW News Marathi
देश / विदेश

राज्यसभेवर भाजपचे पहिल्यांदा ६९ खासदार तर बहुमतासाठी १२६

नवी दिल्ली | राज्यसभेत भाजपचे ३८ वर्षात पहिल्यांदाच ६९ खासदार निवडून आले आहेत. काँग्रेसचे ५० सदस्य असे संख्या बळ आहे. राज्यासभेत २४५ एकूण सदस्यांची संख्या आहे. राज्यसभेत बहुमतासाठी १२६चा सदस्यांचे संख्याबळ असणे गरजेचे आहे. राज्यसभेत शुक्रवारी सात राज्यांतील २६ जागांवर निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपला १० जागापैकी ९ जागावर भाजप विजय मिळाला आहे.

भाजपला १२६चा आकडा गाठण्यासाठी मित्रपक्षांची गरज आहे. पण, सध्या भाजपचे मित्रपक्ष त्यांच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळे भाजपला बहुमत मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नुकतेच भाजपचा मित्रपक्ष तेलगू देसम पार्टी यांनी आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे एनडीएतून बाहेर पडले आहेत.

राज्यसभेतील १७ राज्यातील ५८ जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी ३३ जागावर बिनविरोधी निवड झाली होती. फक्त २६ जागासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील १० जागैपकी ९ जागांवर भाजप निवडून आली. उत्तर प्रदेशात पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर राज्यसभेच्या १० जागांवर सर्वांचे लक्ष लागले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

डोक्याला चेंडू लागून पाकिस्तानी खेळाडूचा मृत्यू

News Desk

साडेतीनशे कोटी रुपयांचा फाइन वसूल

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ४ चकमकी, २-३ दहशतवादी लपून बसल्याची शक्यता  

News Desk
देश / विदेश

लालू यादव यांना सात वर्षांची शिक्षा

News Desk

बिहारच्या चारा घोटाळ्यातील माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयानं ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ३० लाखांचा दंड सुनावली आहे. बिहारमधील लोकसभेची पोटनिवडणूक जिंकल्याचा जल्लोष करणाऱ्या यादव परिवाराला या निकालामुळं मोठा धक्का बसला आहे.

चारा घोटाळ्यातील तीन प्रकरणांमध्ये लालू प्रसाद यादव यांना याआधीच दोषी ठरविण्यात आले होते. त्यावर त्यांना शिक्षाही सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर चौथा आरोप आहे. झारखंडमधील दुमका येथील कोषागारातून बेकायदेशीररित्या ३ कोटी १३ लाख रुपये काढल्याचा होता. त्यावरील सुनावणी ५ मार्च रोजीच पूर्ण झाली होती. मात्र, लालूंच्या वतीनं वेळोवेळी करण्यात आलेल्या याचिकांमुळं त्यावरील निर्णय रखडला होता. अखेर १९ मार्च रोजी त्यावर सुनावणी होऊन लालूंना दोषी ठरवण्यात आले होते.

आज या प्रकरणी शिक्षेची सुनावणी झाली व त्यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. चारा घोटाळ्यात लालूंना आधीच साडेतेरा वर्षांची शिक्षा झाली असून ते सध्या रांची येथील बिरसा मुंडा तुरुंगात आहेत. दुमका कोषागार प्रकरणात माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची निर्दोष सुटका झाली आहे.

Related posts

देशाची वाटचाल गुलामगिरीकडे- राहुल गांधी

News Desk

कोरोना लस गायब, ऑक्सिजनही नाही, त्याबरोबर मोदीही गायब, राहुल गांधींची टीका

News Desk

‘सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारलं’, कारण…..

News Desk