HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन

श्रीनगर | पाकिस्तानकडून आज (२८ फेब्रुवारी) सकाळी पुन्हा सीमारेषेवर एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सीमेजवळील सर्व गावातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी(२६ फेब्रुवारी) भारतीय वायुसेनेच्या ‘मिराज २०००’च्या १२ लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर १००० किलोचे बॉम्ब फेकले होते. या हल्ल्लानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे.

यामुळे सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने बुधवारी (२७ फेब्रुवारी) भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने राजौरा जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करत हवाई शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये आठ जवान शहीद

News Desk

पीएनबीच्या घोटाळ्यातील आरोपींना अटक

News Desk

शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले – सामना

News Desk