नवी दिल्ली | कोरोनामुळे काही राज्यांमध्ये पुन्हा गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारे याबाबत खबरदारी घेत आहेत. हे पाहता, केंद्र सरकार पुढील महिन्यात सर्व राजकीय पक्षांशी बैठक घेणार आहे. राज्यसभा आणि लोकसभेच्या सर्व सदस्यांसोबत ४ डिसेंबरला बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या काळात कोरोनाच्या परिस्थितीविषयी चर्चा केली जाणार आहे.
Government of India calls an all-party meeting of floor leaders in Rajya Sabha and Lok Sabha on December 4 to discuss #COVID19 situation: Sources
— ANI (@ANI) November 30, 2020
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘मी अलिकडच्या काळात रुग्णालये / नर्सिंग होममध्ये आग लागल्याच्या घटनांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. अधिकाऱ्यांनी अग्निसुरक्षा उपायांचे पालन न करणे ही चिंतेची बाब आहे.
गृहसचिव पुढे म्हणाले, ‘नुकतीच राजकोट येथील कोविड रुग्णालयात आग लागल्याने ६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर अहमदाबादमधील रुग्णालयात आठ जणांचा मृत्यू झाला. भारत कोरोना विषाणूविरूद्ध लढाई लढत आहे, तेव्हा अशा घटना टाळण्यासाठी आपण अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.’
Recently 6 precious lives of COVID-19 patients were lost in a fire incident in ICU ward of a hospital in Rajkot & 8 lives were lost in a hospital in Ahmedabad. When India is fighting against COVID-19, utmost precaution needs to be taken to avoid such incidents: Home Secretary https://t.co/YLmYWdVl18
— ANI (@ANI) November 30, 2020