HW News Marathi
देश / विदेश

‘चांद्रयान-२’ने पार केला महत्त्वाचा टप्पा, भारताची चंद्राच्या दिशेने आगेकूच सुरू

नवी दिल्ली | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोडलेल्या ‘चांद्रयान-२’ने प्रवासाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. चांद्रयान-२ ने पृथ्वीची कक्षा सोडली असून भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी (१३ ऑगस्ट) रात्री २ वाजून २१ मिनिटांनी गुड बाय करत आता ‘चांद्रयान-२’ने आता थेट चंद्राच्या दिशेने आगेकूच केल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली.

चांद्रयान -२ ने पृथ्वीची कक्षा सोडण्यापूर्वी ‘इस्रो’ने ‘ट्रान्स लूनार इंजेक्शन’ हा किचकट टप्पा यशस्वीरित्या पार पाडला असल्याची माहिती इस्त्रोकडून देण्यात आली आहे. ‘चांद्रयान-२’चा चंद्राच्या बाह्य कक्षेत सहज प्रवेश व्हावा म्हणून यानातील लिक्विड इंजिन सुमारे १२०३ सेकंदापर्यंत फायर केले गेले.

‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी ‘चांद्रयान-२’ पुढील प्रवासाबद्दल माहिती दिली. ‘चांद्रयान-२’ हे चंद्राच्या वाटेवर सहा दिवस असेल आणि सुमारे ४.१ लाख किलोमीटरचा प्रवास करून २० ऑगस्टला अंतिम कक्षेत पोहोचेल,’ असं सिवान म्हणाले. चंद्र हा पृथ्वीपासून ३.८४ लाख किलोमीटर अंतरावर आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Republic Day | हे आहेत आतापर्यंतचे परराष्ट्रीय प्रमुख पाहुणे

News Desk

देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ | अजित पवार

News Desk

नीरव मोदी लंडनमध्ये, घोटाळ्याबाबतच्या प्रश्नांवर उत्तर देण्यास दिला स्पष्ट नकार

News Desk