HW News Marathi
देश / विदेश

‘वंचित’ला सोबत घेण्यासाठी काॅंग्रेसची मोर्चेबांधणी

मुंबई | लोकसभा निवडणुकीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागल्याने राज्यातील कॉंग्रेस आघाडीने येत्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राहुल गांधी यांनी कॉंग्रेस आघाडी बरोबर वंचित आघाडीला देखील सोबत घ्या, असा आदेश राज्यातील नेत्यांना दिला आहे. तर काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला 25 जागा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.या संदर्भात माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे .

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसकडे 50 पेक्षा जास्त जागांची मागणी केली आहे. मात्र या बैठकीत काँग्रेसकडून वंचितला केवळ 25 ते 30 जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉंग्रेस या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी 3 जुलै रोजी चर्चा करणार असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दारूण पराभव स्वीकारावा लागला. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून स्वबळावर लोकसभा निवडणूक लढली. वंचित आघाडीमुळे कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे अनेक उमेदवार पडले असल्याचे बोलले जात होते. इतकेच नव्हे तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही पराभव वंचित आघाडीमुळेच झाला असल्याचे म्हंटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : घाबरून युद्ध जिंकता येत नाही, आपण जिद्दीने लढू !

swarit

फेसबुक डेटा लिक प्रकरणी केंब्रिज एनालिटिका कंपनी बंद

swarit

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात, पत्नीचा झाला मृत्यु

News Desk