HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तान सरकारकडून १८२ मदरशांवर नियंत्रण

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय दबावमुळे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांविरोधी कारवायांना वेग आला आहे. “आम्ही दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत असून पाकिस्तान सरकारकडून १८२ मदरशांवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांविरूद्ध कारवाई करत १०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे”, अशी माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली आहे.

पाकिस्तान सरकारने अखेर मंगळवारी (५ मार्च) जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करत या संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरच्या २ भावांसह एकूण ४४ दहशतवाद्यांना अटक केली होती. दरम्यान, पाकिस्तानकडून आंतराष्ट्रीय दबावाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात असल्याचे म्हटले जात असले तरी पाकिस्तानने मात्र ते नाकारले आहे. “आम्ही कोणाच्याही दबावाखाली येऊन ही कारवाई केलेली नाही. आम्ही यापूर्वीच दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईची योजना आखली होती”, असे पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संपूर्ण जगात फक्त गेल्या २४ तासांत आढळले ३० हजारांहूनही अधिक कोरोनाबाधित

News Desk

काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार कुमार केतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

News Desk

पाकिस्तान करणार ‘या’ भारतीय नागरिकाची सुटका

News Desk