HW News Marathi
Covid-19

देशात कोरोनाचा कहर सुरुच! मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली

नवी दिल्ली | कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध राज्यांनी लावलेला लॉकडाउन, गर्दी टाळण्यासाठी आणण्यात आलेले निर्बध. असं सगळं देशात सुरू असलं, तरी कोरोनाचं थैमान अजूनही नियंत्रणात हव तसं आलेलं नाही. देशात रोज ३ ते ४ लाखांच्या जवळपास पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहे. गेल्या २४ तासांतील म्हणजे मंगळवारची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली असून, करोनावर मात करून परतलेल्या रुग्णांची संख्या वगळता चित्र फारसं आशादायक नसल्याचंच आकडेवारीतून दिसत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत तीन लाख ४८ हजार ४२१ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर याच कालावधीत तीन लाख ५५ हजार ३३८ जणांनी कोरोनावर मात केली. चिंतेची बाब म्हणजे देशात एका दिवसात झालेल्या मृतांच्या संख्येनं नवा विक्रम नोंदवला आहे. देशात मंगळवारी ४,२०५ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबळींची संख्या आता २,५४,१९७ वर पोहोचली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्ताने ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ अभियानाला उद्यापासून सुरुवात

News Desk

राज्यात ३१ मेपर्यंत लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता

News Desk

परिस्थीती नियंत्रणात आली नाही तर पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करावी लागेल – जयंत पाटील

News Desk