HW News Marathi
देश / विदेश

#CoronaVirus | पंतप्रधानांनी घोषित केलेला ‘जनता कर्फ्यू’ म्हणजे नक्की काय ?

नवी मुंबई | जगभरात अनेक देशांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना व्हायरसने मोठा धुमाकूळ घातला आहे. भारतात देखील आता या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १८३ वर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (१९ मार्च) देशातील जनतेला संबोधित करून काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. याचसोबत, यावेळी पंतप्रधानांनी येत्या रविवारी (२२ मार्च) देशात ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याची मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी घोषित केलेला ‘जनता कर्फ्यू’ म्हणजे नक्की काय ? जाणून घ्या

पंतप्रधानांनी घोषित केलेला ‘जनता कर्फ्यू’ म्हणजे नक्की काय ?

  • ‘कोरोना’मुळे रविवारी (२२ मार्च) देशात लागू होणार ‘जनता कर्फ्यू’
  • येत्या रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ दरम्यान देशात हा कर्फ्यू लागू होणार
  • भारत किती सज्ज आहे ?, याची चाचणी घेण्यासाठी हा जनता कर्फ्यू
  • रविवारी संध्या ५ वाजता आपले कर्तव्य बजावणाऱ्यांचे, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे ‘आभार प्रदर्शन’ होणार
  • डॉक्टर, नर्स, पोलीस, मीडिया, ड्रायव्हर्स यांचे आभार मानणार
  • टाळ्या, थाळ्या, घंटा, सायरन वाजवून कृतज्ञता व्यक्त करा
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

WestBengalElection : सुरुवातीचे कल हाती, तृणमूलला स्पष्ट बहुमत

News Desk

न्यूज पोर्टल्ससाठी नवीन दारे उघडणार , एच डब्ल्यू न्यूज पोर्टल आणि साऊथ लाईव्ह न्यूज पोर्टल एकत्र

News Desk

‘फरार’ विजय माल्ल्या

News Desk