HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीतील कृषी कायद्यांविरोधातील काँग्रेसचं आंदोलन पेटलं, प्रियांका गांधींना घेतलं ताब्यात

नवी दिल्ली | कृषी कायद्यांविरोधातील काँग्रेसने आज (२४ डिसेंबर) नवी दिल्लीत सुरू केलेलं आंदोलन चांगलंच तापलेलं दिसत आहे. काँग्रेसने देखील आता आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळत आहे. कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना कृषी कायद्यांना विरोध म्हणून रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रियांका यांना ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांना फरफटत व्हॅनमध्ये टाकलं. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याने वातावरण तापले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देण्यासाठी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे निघाले आहेत. दुसरीकडे प्रियांका गांधी या कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. यावेळी शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. ‘नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी’च्या घोषणा देत या आंदोलकांनी रस्ता अडवून ठेवला. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड सुरू केल्याने आंदोलकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी फरफटतच या आंदोलकांना व्हॅनमध्ये डांबले. त्यामुळे येथील वातावरण अधिकच चिघळले असून पोलिसांनी आंदोलन परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

दरम्यान, राहुल गांधी आज कृषी कायद्यांविरोधात राष्ट्रपती भवनाच्या दिशेने पायी मार्च काढला आहे. पोलिसांनी या मार्चला परवानगी नाकारली आहे. आम्ही या मार्चला परवानगी दिलेली नाही. ज्या नेत्यांना राष्ट्रपती भवनाने भेटण्याची परवानगी दिली आहे. त्यांनाच केवळ राष्ट्रपती भवनाकडे जाता येणार आहे, असं नवी दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्ताने सांगितलं आहे. राहुल गांधी हे काँग्रेस नेत्यांसोबत राष्ट्रपती भवनापर्यंत मार्च काढणार आहेत. यावेळी ते राष्ट्रपतींना 2 कोटी शेतकऱ्यांचं निवेदन देणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात ८ नक्षलवाद्यांचा खात्मा

News Desk

संजय राऊत आज दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना भेटणार

News Desk

देशभरात रमजान ईदचा उत्साह

News Desk