HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीची लोकसंख्या २०३५ सालापर्यंत ४.५ करोड होणार

मुंबई | देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता दिल्लीची लोकसंख्या २०३५ सालापर्यंत ४.५ करोडने वाढू शकते तर हीच लोकसंख्या २०५० पर्यंत भारताच्या फक्त शहरी भागांत पहायला मिळेल, असा रिपोर्ट यूएनकडून देण्यात आला आहे. यूएनच्या पॉप्यूलेशन डिव्हिजन रिपोर्टनुसार विचार केला तर २०१५मध्ये दिल्लीची लोकसंख्या २५.९ दशलक्ष इतकी होती. पण २०३५ मध्ये ही लोकसंख्या ६७ टक्क्यांनी वाढलेली पहायला मिळणार आहे.

लोकसंख्येबाबत केवळ दिल्लीच नाही तर मुंबईचीसुद्धा तीच अवस्था आहे. २०१५ मध्ये मुंबईची लोकसंख्या १.९ करोड इतकी होती. हा आकडा २०३५ पर्यंत २.७० करोडवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या २० वर्षांत मुंबईची लोकसंख्या ४१.६ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तर २०३५ पर्यंत कोलकात्याची लोकसंख्या ३५ टक्क्यांनी वाढणार असल्याचा दावा देखील या रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. यूएनच्या रिपोर्टेनुसार २०५०पर्यंत भारतातील ५२.०८ टक्के लोकसंख्या ही फक्त शहरी भागात पहायला मिळेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कर्नाटकात राजकीय भूकंप : आमदारांच्या राजीनाम्याने काँग्रेस-जेडीएसचे सरकार धोक्यात ?

News Desk

राज्यसभेत निलंबित झालेल्या रजनी पाटील यांच्याकडे काँग्रेसने सोपवली ‘ही’ जबाबदारी

Aprna

‘CM नाही PM बदला’, काँग्रेस कडून भाजपवर बोचरी टीका!

News Desk
महाराष्ट्र

“महावेध” प्रकल्पाकडे महाराष्ट्र कृषी विभागाचे दुर्लक्ष

Adil

सोलापुर | शेतक-यांना अनेकदा हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. दुष्काळ, गारपीट यांमुळे होणारे पीकाचे नुकसान, दुबार पेरणीत होणारा खर्च अशा अनेक संकटाचा सामना शेतक-यांना नेहमीच करावा लागतो. हवामानाचा अचूक अंदाज न आल्यामुळे शेतक-यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून कृषी विभाग महाराष्ट्र व स्कायमेट वेदर सर्विस यांच्या संयुक्त भागिदारीतुन स्वंयचलित हवामान केंद्रे महाराष्ट्रातील सर्व महसुल मडंळात “महावेध” प्रकल्प म्हणून २०१६ मध्ये उभारली गेली होती.

“महावेध” प्रकल्पाअंतर्गत राज्यातील सर्व महसुल मंडळात २ हजार ६५ स्वंयचलीत हवामान केंद्रे उभारण्यात आली. या प्रकल्पासाठी प्रत्येक महसुल विभागातर्फे जागा उपल्ब्ध करून दिली गेली होती. “महावेध” प्रकल्पाअंतर्गत मिळणाऱ्या माहितीचा उपयोग पिक विमा योजना, कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन कृषी संशोधन व आप्पत्ती व्यवस्थापनासाठी होणार होता.

या प्रकल्पातंर्गत शेतकऱ्यांना १२ किलोमीटर परीसरातील अचूक हवामानाची नोंद दर १० मिनीटांनी उपल्बध होणार होती. या हवामान नोंदीमध्ये पर्जन्य ,तापमान ,हवेची सापेक्ष आद्रता ,वा-याचा वेग , दिशा या वातावरणातील घटकांचे मोजमाप केले जाते. जमा झालेली माहिती पीकविमा योजना, पीकविषयक सल्ला, हवामान विषयक संशोधन यासाठी ठरणार होती. पण आनेक ठिकाणी हवामानाचा वेध घेणारे महावेध प्रकल्प धूळखात पडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हवामानाच्या अचूक अंदाजापासून वंचित राहत आहेत. प्रचंड गाजावाजा करुन सुरु झालेली योजना इतर सरकारी योजनाप्रमाणेच अपयशी ठरल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.

राज्यात कुठे कुठे आहेत हवामान केंद्रे

  • राज्यातील सर्व महसुल मंडळात हवामान केंद्रे आहेत
  1. यवतमाळ -१०१
  2. पुणे – १००
  3. सोलापूर – ९१
  4. नाशिक – ९२
  5. बुलडाणा – ९०
  6. सातारा – ९१
  7. आहमदनगर – ९७
  8. गडचिरोली – ४०
  9. चंद्रपुर – ५०
  10. गोदिंया – २५
  11. वर्धा – ४७

Related posts

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन, बॉलिवूडवर शोककळा

News Desk

राज्यतले एक मंत्री तुरुंगात जाऊन आले, तर देशमुख जाण्याच्या तयारीत’, अतुल भातखळकरांची टीका!

News Desk

महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला, हवा येऊ द्या! सामनातून भाजपला इशारा

News Desk