HW News Marathi
देश / विदेश

लोकशाही धोक्यात – सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचा आरोप

दिल्ली – देशाच्या इतिहासात या अधी कधीच न झालेली घटना शुक्रवारी १२ जानेवारी रोजी घडली. ती म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेऊन लोकशाही धोक्यात असल्याची चिंता व्यक्त केली. गेल्या दोन महिन्यांपासून सुप्रीम कोर्टाचे कामकाज व्यवस्थित चालत नाही.

तसेच या संदर्भात न्यायमूर्तींनी सरन्यायाधीश यांच्याकडे तक्रार करुन ही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे या चार ही न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आम्ही आमचा आत्मा विकला नाही. न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाही टिकणार नाही असे चेलमेश्वर यांनी सांगतले’. तसेच न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांना पाठविलेले पत्र सार्वजनिक केले.

ही पत्रकार परिषद न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या घरी आयोजित केली होती. यात जे चेलमेश्वर, रंजन गोगोई, माधव बी लोकूर आणि कुरीयन जोसेफ या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली.

१) गेल्या दोन महिन्यापासून सुप्रीम कोर्टाचे कामकाज व्यवस्थित चालत नाही

२) आम्ही आमचा आत्मा विकला असे भविष्यात कोणी बोलू नये.

३) सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाबदल सरन्यायाधीना पत्र देखील पाठविले. पण, सरन्यायाधीसांनी याकडे लक्ष्य दिले नाही

४) न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाही देखील टिकणार नाही.

५) न्याय व्यवस्थेत भ्रष्टाचार वाढला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोशल मीडिया भाजपचे ऑक्सिजन, तर ही नळी मोदी फेकून देतील हे अशक्यच !

swarit

#NirbhayaCase | नराधमांना फासावर चढवल्यानंतर निर्भयाच्या आईची पहिली प्रतिक्रिया

News Desk

सोनिया गांधीच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी राहणार

News Desk