HW News Marathi
देश / विदेश

ज्यांचे फोटो छापायचे ते छापा, आपापसात मारामाऱ्या करा…महाजॉब पोर्टलच्या जाहिरातीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (१७ जुलै) केंद्रीय गृहमंत्री आणि मंत्रिगटाचे प्रमुख अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेच्या सुरुवातीला त्यांनी उसाच्या क्षेत्राबद्दल माहिती दिली. या वर्षी महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याची त्यांनी माहिती दिली. या वर्षी उसाचा बंपर क्रॉप राहील अशी अवस्था आहे.

 

त्यातूनच शेतकऱ्यांना एफ आर पी मिळाली पाहिजे आणि साखर कारखानदारी देखील चालली पाहिजे या दृष्टीने अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला मदत करा, अशी विनंती अमित शाह यांच्याकडे केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. गेल्या काही काळात दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे साखर कारखाने अडचणीत आले त्यामुळे त्यांच्या लोन बाबत विचार करावा. तसेच, साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.कर्जाचं पुनर्गठण, साखर कारखान्यांना मदत, सॉफ्ट लोन, साखर भाव पडणार नाही यासाठी सकारात्मक चर्चा झाली, किमान विक्री दर वाढवण्याची मागणी केली आहे”, असं फडणवीस म्हणाले.

‘कोरोना संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती दिली. देशाचे गृहमंत्री कोरोना संदर्भात लक्ष देत आहे. केंद्रात आमचे सरकार आहे, त्यामुळे आम्ही दिल्लीत आलो. ही कुठलीही राजकीय भेट नाही. आम्हाला सरकार पाडण्यात इंटरेस्ट नाही. स्वतःला मारून रडणारे हे सरकार आहे,’ अशी प्रतिक्रिया अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

भाजपची नवी कार्यकारिणी अद्याप तयार झालेली नाही, त्यानंतर संसदीय समिती होईल, त्यामध्ये नियुक्त करण्याचा अधिकार पंतप्रधान, पक्षप्रमुखांचा आहे, माझी अद्याप नियुक्ती झालेली नाही, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

शरद पवार काय करताहेत म्हणून आम्ही करायचं वगैरे अशी स्पर्धा नाही, केंद्रात आमचं सरकार आहे, त्यामुळे ज्या आवश्यक मागण्या आहेत त्या घेऊन आलो आहोत.

देशात काय चालतं, किंवा अन्य राज्यात काय चालतं हे मला माहिती नाही, मी महाराष्ट्रातील नेता आहे, असं म्हणत फडणवीस यांनी राजस्थानातील मिशन लोटसवर भाष्य केलं.

तर, काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी महाजॉब पोर्टलच्या जाहिरातीवर केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो असण्यावरून टीका केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमचं म्हणण एव्हढंच आहे, फोटो कुणाचेही छापा, पण तुम्ही ज्या मोठ्या मोठ्या घोषणा केल्या आहेत, इतक्या कंपन्या येतील, इतके रोजगार मिळतील, या संदर्भात काही तरी कारवाई करा. बाकी तुम्हाला ज्यांचे फोटो छापायचे आहेत, ज्यांचे चेहरे दाखवायचे आहेत, त्यांचे दाखवा, आपआपसात मारामाऱ्या करा, फक्त लोकांना फायदा झाला पाहिजे याकडे लक्ष द्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#NirbhayaCase : अखेर चारही दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा, उद्या फासावर चढवणार

swarit

कोण आहे स्टीफन हॉकिंग

News Desk

विधानमंडळाच्या अधिकाराचा संकोच करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत परामर्श घेण्याची राष्ट्रपतींना विनंती! – रामराजे नाईक-निंबाळकर

Aprna