HW News Marathi
देश / विदेश

ममता दीदी आता का बदलल्या ? का अफवा पसरवत आहेत, मोदींचा सवाल

नवी दिल्ली | नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात आंदोलन करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खरपूस समाचार घेतला आहे. या कायद्याविरोधात ईशान्यकडील राज्यात मोठ्यप्रमाणात विरोद्ध प्रदर्शन होत आहे. यासंदर्भात मोदी म्हणाले की, “आता दीदी का बदलल्या? का अफवा पसरवत आहेत? बंगालच्या जनतेवर विश्वास ठेवा. निवडणुका होतात, जातात, सत्ता येते जाते. पण, तुम्ही ऐवढ्या का घाबरता,” असा टोला मोदींनी ममता बॅनर्जी यांना लगावला. तसेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करुन काँग्रेस राजकीय पोळी भाजण्याचे काम करत असल्याचा आरोपही मोदींनी केला.

मोदी पुढे म्हणाले की, “बंगालच्या जनतेवर विश्वास ठेवा. इथल्या जनतेवर तुमचा विश्वास नाही का? बंगालच्या नागिरकांना तुम्ही शत्रू का वाटते?, असा सवाल देखील मोदींनी ममता बॅनर्जींना केला. ‘आज ममता बॅनर्जी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात कोलकाताहून थेट संयुक्त राष्ट्र संघात पोहचल्या आहेत. याच ममता दीदी काही वर्षापूर्वी बांगलादेशमधून येणाऱ्या शरणार्थ्यांना आपण मदत करायला हवी अशी भूमिका घ्यायच्या. तसेच त्यांनी संसदेत अध्यक्षांसमोर येऊन कागद फेकायच्या. मात्र आता याच ममता दीदी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत आहेत.’ मोदींनी दिल्लीत आज (२२ डिसेंबर) रामलीला मैदाना पार पडलेल्या जाहीर सभेत ममता बॅनर्जीवर तोफ डागली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरच्या राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाई

News Desk

गुगलचे कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाईंची भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक

News Desk

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती?

News Desk