HW News Marathi
देश / विदेश

सैन्यात दलित आरक्षणासाठी पंतप्रधानांशी चर्चा – रामदास आठवले

मुंबई केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआय(ए)चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दलितांना सैन्य दलात आरक्षण देण्याची मागणी केली आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही यावर चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.

एएनआय यावृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आठवले यांनी ही माहिती दिली. भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी देशसेवा करायला हवी, असे सांगत आठवले यांनी भारतीय तरुणांनी लष्करात भरती होऊन देशसेवेत आपले योगदान देण्याचीही विनंती या वेळी केली.

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाल्यानंतर आठवले यांनी या सामन्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. या वेळी त्यांनी क्रिकेटमध्येही अनुसूचित जाती-जमातीला २५ टक्के आरक्षण देण्याची मागणी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोळशावर आधारित उर्जा निर्मिती जानेवारीत 9.2 टक्केंनी वाढली

News Desk

काँग्रेसची वारी शिवाजी पार्कच्या दारी!

News Desk

कावेरी नदीवर कोणत्याही राज्याचा अधिकार नाही

swarit
देश / विदेश

उत्तर प्रदेशातील भीषण रेल्वे अपघातात 23 ठार

News Desk

मुजफ्फरनगर :उत्तरेत झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने देशभरात थरकाप उडाला आहे. पुरी-हरिद्वार उत्कल एक्सप्रेस चे 14 डब्बे रुळावरून घसरून शनिवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला. यात 40 जण जखमी झाले आहेत. मुजफ्फर नगर जिल्ह्यात खतौली येथे झालेल्या या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना तत्काळ मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या. सुरेश प्रभू यांनी टिष्ट्वट करून, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती दिली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना मदत आणि बचावकार्याची देखरेख करण्यास सांगितले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या गाझियाबादमधून मदतीसाठी रवाना झाल्या आहेत. मेडिकल व्हॅनही येथे पोहोचल्या आहेत.

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Related posts

सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या ‘अजित पवारांकडून काहीतरी शिका’ 

News Desk

फ्रान्समधील हल्ल्यानंतर धर्माच्या नावाखाली अधर्मी कृत्ये करणाऱ्यांना सामनातून सुनावले खडे बोल

News Desk

#PulwamaAttack : दहशतवाद्यांनी आपले तळ पाकिस्तानी लष्कराच्या जवळ नेले

News Desk