HW News Marathi
देश / विदेश

रेल्वेगाड्यांना आता साहित्यकृतींची नावे!

नवी दिल्ली – रेल्वे गाड्यांना प्रसिद्ध साहित्यिकांच्या साहित्यकृतींची नावे देण्याचा विचार रेल्वे प्रशासन गांभीर्याने करत आहे. म्हणजे महाराष्ट्रात येणाऱ्या गाड्यांना कुसुमाग्रज किंवा वि. स. खांडेकर अथवा पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यकृतीचे नाव, पश्चिम बंगालला जाणाऱ्या गाडीला महाश्वेता देवी यांच्या साहित्यकृतीचे आणि बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांना रामधारी सिंग दिनकर यांच्या एखाद्या सुप्रसिद्ध पुस्तकाचे नाव, अशा प्रकारचे हे नामांतर असणार आहे.

‘रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही कल्पना मांडली असून भारतीय रेल्वे ही भारताला आणि भारतातील सर्व समाजांना जोडणारी आहे. मतभेद मिटवणारी आहे. हाच धागा पकडून रेल्वेने विविध संस्कृती आणि परंपरा यांचे प्रतिबिंब रेल्वेमध्ये उमटविण्यासाठी ही कल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे विविध प्रांतातील प्रसिद्ध साहित्यिक आणि त्यांच्या साहित्यकृती यांची नावे देशभरातील लोकांना माहिती होतील,’ असे रेल्वे मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानेसांगितले.

विविध भारतीय भाषांमधील थोर तसेच पुरस्कारप्राप्त साहित्यिक आणि त्यांच्या सुप्रसिद्ध साहित्यकृती यांच्या नावांची यादी करण्याचे काम सध्या रेल्वे मंत्रालयातर्फे सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या-त्या साहित्यकृती आणि रेल्वेची नावे यांची सांगड घालण्यात येणार आहे. दादर-सावंतवाडी-दादर या एक्स्प्रेसचे नामकरण नुकतेच ‘तुतारी एक्स्प्रेस’ असे करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध मराठी कवी कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांच्या ‘तुतारी’ याकवितेवरून या गाडीला नाव देण्यात आले आहे. अशीच नावे या पुढे एक्स्प्रेस आणि मेल गाड्यांना दिली जाणार आहेत.

भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर काही रेल्वेगाड्या, स्थानके आणि रेल्वे मंडळांची नावे बदलण्यात आली आहेत. हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष पंडित मदनमोहन मालवीय यांच्या स्मरणार्थ ‘महामना एक्स्प्रेस’ आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीप्रित्यर्थ‘अंत्योदय एक्स्प्रेस’ सुरू करण्यात आली. तसेच दीनदयाळ यांच्या स्मरणार्थ दीन दयाळू कोचची निर्मिती करण्यास प्रारंभ करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रतिभेने ‘उंबरठा’ सोडला!

News Desk

येत्या वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार, महामार्गावर GPS ट्रॅकर लागणार, नितीन गडकरींची घोषणा

News Desk

भारत सर्वांत आळशी देश

News Desk