HW News Marathi
देश / विदेश

हिंदू-मुस्लिमांमधील धार्मिक वादामुळे माझ्या वडिलांचा बळी गेला !

नवी दिल्ली | “हिंदू-मुस्लिमांमध्ये धार्मिक वादामुळे आणि या दोन्ही समाजात मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या तणावामुळेच आज माझ्या वडिलांचा बळी गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्या वडिलांना जीव गमवावा लागला ?”, असा संतप्त सवाल पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचा मुलगा अभिषेक याने केला आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे गोवंशहत्येच्या संशयावरून झालेल्या हिंसाचारात पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला. दरम्यान, बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८७ जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून २ जणांना अटक केली आहे.

”मला माझे वडील धार्मिक कारणांमुळे समाजात हिंसाचार न करणारा एक चांगला नागरिक घडवू इच्छित होते. मात्र, हिंदू-मुस्लिम समाजात निर्माण झालेल्या धार्मिक वादामुळे आज माझ्या वडिलांनाच त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. आज या हिंसाचारात माझ्या वडिलांनी जीव गमावला, उद्या कुणाच्या वडिलांना जीव गमवावा लागेल?”, असा सवाल पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचा मुलाने विचारला आहे.

बुलंदशहर जिल्ह्यातील एका गावातील शेतात मृत गायीचे अवशेष आढळले. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केले. यावेळी पोलिसांनी उपस्थित जमावाला पांगविण्यासाठी गोळीबार केला. या गोळीबारात १ तरुण गंभीर जखमी झाला. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी पोलीस स्थानकावर हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणावर मोडतोड आणि जाळपोळ केली. यात गंभीर जखमी झालेले पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अबब…भाजप सदस्य इसीसमध्ये

News Desk

भारत- चीनचे सैन्य भिडले

News Desk

२९ वस्तूवरील जीएसटी हटवली

swarit